मनोरंजन

अशा व्यक्तीला माझ्या भाऊच्या धक्क्यावर जागा नाही; अनुश्री माने–राकेश वादावर रितेश देशमुख संतापले

मुंबई: बिग बॉस मराठी ६ च्या घरात दुसऱ्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक अनुश्री मानेने तिचा आक्रमक खेळ दाखवायला सुरुवात करत राकेशसोबत थेट वाद उभा केला आहे. घरातील मोठ्या बेडवरून सुरू झालेल्या या वादामुळे संपूर्ण घरातील वातावरण तापले आहे.

राकेशला पाठदुखीचा त्रास असल्याने मोठ्या बेडवर झोपायची गरज होती. मात्र अनुश्रीने ती जागा सोडण्यास नकार दिला. घरातील इतर सदस्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरीही अनुश्री कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. यावेळी अनुश्रीने राधावर मोठ्याने ओरडत आडमुठेपणा केल्याचं पाहायला मिळालं.

राकेशने समजुतीने अनुश्रीचा हात धरून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र या कृतीवरून पुढे मोठा वाद निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी रुचिता जामदारने हा मुद्दा पुन्हा उचलत स्पष्ट मत मांडलं की, “कोणत्याही मुलीला परवानगीशिवाय हात लावू नये.” या वक्तव्यामुळे अनुश्री आणि राकेशमधील भांडण अधिकच चिघळलं.या संपूर्ण प्रकरणावर ‘भाऊचा धक्का’चा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्यात होस्ट रितेश देशमुख प्रचंड संतापलेल्या अवस्थेत दिसत आहेत. प्रोमोमध्ये रितेश म्हणताना दिसतात,

“मुलींना परवानगीशिवाय हात लावायचा नसतो म्हणजे काय?”

रुचिताने अनुश्रीला खेचणं चुकीचं असल्याचं सांगितल्यानंतर रितेश अधिकच संतापतात. ते स्पष्टपणे सांगतात की, जर एखादी व्यक्ती समजावून सांगण्याच्या लायकीची नाही असं म्हटलं जात असेल, तर पुढच्या दिवशी समजावणारा चुकीचा ठरतो, असं होऊ शकत नाही.

रितेशच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे घरातील वातावरण आणखी गडद झालं असून अनुश्रीलाही मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. मागील सीझनमध्ये जान्हवी किल्लेकरला ‘भाऊचा धक्का’वरून घराबाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे यंदा रुचिता जामदारवरही कारवाई होणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आता येणाऱ्या ‘भाऊचा धक्का’च्या भागात नेमका काय निर्णय घेतला जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

10 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

10 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

12 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

12 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago