मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात साखरेची चक्क ३९२ पोती चोरीला गेली…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असुन या ठिकाणी अनेकवेळा चोऱ्या तसेच इतर प्रकार घडत असतात. परंतु रांजणगाव MIDC मध्ये असलेल्या एका गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क ३९२ साखरेची पोती चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

 

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon MIDC Police) दिलेल्या माहितीनुसार दि १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०:३० ते दि ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) मधील पिव्हीसन्स कंपनी (PV Sons) जवळील अग्रवाल यांचे साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाचे गोडावुन (ता. शिरुर,जि. पुणे) येथे नॅशनल बल्क हँडलींग कापोरेषन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ताब्यात आसणाऱ्या गोडावुन मधील रचलेली पोती अचानक ढासळुन बाजुच्या भिंतीवर पडली. त्यामुळे ती भिंत कोसळून पोती बाहेर रोडवर गेली.

 

त्यामुळे रोडने येणाऱ्या-जाणाऱ्या अज्ञात लोंकानी त्या ठिकाणावरुन ५० किलो वजनाची एकुन ३९२ साखरेची पोती (प्रति किलो ३७. ५० रुपये ) किमतीचा एकुण ७ लाख ३५ हजार रुपयाचा माल रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या अज्ञात लोकांनी चोरुन नेला असल्याची फिर्याद अक्षय कोंडीराम कटके (वय २४) रा. इंदीरा चौंक, निलंगा, ता. निलंगा जि. लातुर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला दिली आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक

रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत

रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण

शिरुर; पनीर बनविण्याच्या कारखान्यात भागीदारी देतो म्हणुन महिलेसह तिच्या मैत्रिणीला करोडोंचा गंडा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

22 मिनिटे ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

28 मिनिटे ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

34 मिनिटे ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

39 मिनिटे ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

2 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

2 तास ago