crime
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असुन या ठिकाणी अनेकवेळा चोऱ्या तसेच इतर प्रकार घडत असतात. परंतु रांजणगाव MIDC मध्ये असलेल्या एका गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क ३९२ साखरेची पोती चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon MIDC Police) दिलेल्या माहितीनुसार दि १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०:३० ते दि ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) मधील पिव्हीसन्स कंपनी (PV Sons) जवळील अग्रवाल यांचे साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाचे गोडावुन (ता. शिरुर,जि. पुणे) येथे नॅशनल बल्क हँडलींग कापोरेषन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ताब्यात आसणाऱ्या गोडावुन मधील रचलेली पोती अचानक ढासळुन बाजुच्या भिंतीवर पडली. त्यामुळे ती भिंत कोसळून पोती बाहेर रोडवर गेली.
त्यामुळे रोडने येणाऱ्या-जाणाऱ्या अज्ञात लोंकानी त्या ठिकाणावरुन ५० किलो वजनाची एकुन ३९२ साखरेची पोती (प्रति किलो ३७. ५० रुपये ) किमतीचा एकुण ७ लाख ३५ हजार रुपयाचा माल रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या अज्ञात लोकांनी चोरुन नेला असल्याची फिर्याद अक्षय कोंडीराम कटके (वय २४) रा. इंदीरा चौंक, निलंगा, ता. निलंगा जि. लातुर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला दिली आहे.
रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक
रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत
रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण
शिरुर; पनीर बनविण्याच्या कारखान्यात भागीदारी देतो म्हणुन महिलेसह तिच्या मैत्रिणीला करोडोंचा गंडा
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…