मुख्य बातम्या

चिंचणीच्या जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना

शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी अक्षय पवार, उपाध्यक्षपदी हेमंत गवळी, कोषाध्यक्षपदी महेश उपाध्ये यांची निवड करण्यात आली. तर संघाचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बापू रायकर यांची निवड करण्यात आली.

या मेळाव्यात शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या तहसीलदार पदावर कार्यरत असणारे सागर ढवळे यांनी शाळेतील वर्गांमध्ये फॅन बसवण्यासाठी ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली.यावेळी सरपंच गोरख पवार, माजी सरपंच बापू शिवाजी पवार, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण पवार, तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत पवार, माजी अध्यक्ष आकाश पवार, अमोल पवार, दिपक पवार, शरद पवार, सुनील पवार, राजेंद्र साबळे, विशाल गोरे, राजेंद्र पवार, सागर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Video; शिरुर तालुक्यात जमीनीच्या ताब्याच्या वादातुन सिनेस्टाईल हाणामारी

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही दत्तक गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago