मुख्य बातम्या

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

पुणे : शिरूर लोकसभेसाठी आग्रही असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार असल्याची प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे. यामुळे आढळराव पाटील नरमले असल्याची चर्चा रंगली आहे.

शिरूरच्या उमेदवारीवर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी मला काम थांबवू नका असे सागितले आहे. पण जो पक्ष देईल तो आदेश मानणार, काम करणार. मी शिवसैनिक आहे, अर्थात धनुष्यबाणावर लढायला आवडेल. शिरूरमधून सुनेत्रा पवार किंवा वळसे पाटील उभा राहतील असं वाटत नाही. मी माझा जास्त वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरत होतो, लोकांच्या अडचणी सोडवत फिरत होतो. आज म्हाडा अध्यक्षपद स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली. पण आपल्या सर्वांना वाटतं पत्ता कट झाला की काय? पण तसे काही नाही. मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम करणार. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल, तिकीटासाठी कधीच मी फिरत नाही. अजित पवार आणि मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम आम्हाला काम करावं लागलं असं आढळराव पाटील म्हणाले. मी शिवसैनिक आहे, अर्थात धनुष्यबाणावर लढायला आवडेल’

अमोल कोल्हे अपयश झाकण्यासाठी बेंबीच्या देठापासून भाषण करत आहेत, असे सांगताना आढळराव पाटील म्हणाले की, ‘पाच वर्षात त्यांना काही जमलं नाही. मी मंजूर केलेली पाच बायपास रस्ते कामे माझीच आहेत. जो काम करत नाही ते क्रिडीट घेण्याच काम करत आहेत. बैलगाडा शर्यतसाठी मी काम केलं, त्यासाठी अनेकजणांनी आंदोलन केली आहेत. मी अमोल कोल्हे याच्यासारखे पक्ष बदलले नाहीत. अमोल कोल्हे यांनी अनेकदा पक्ष बदलले. ते नेते आहेत की अभिनेते त्याचे त्यांनाच माहिती. मी आहे त्याच शिवसेनेत आहे. मला लोकसभा मिळाली नाही तरी चालेल, तिकीटासाठी कधीच मी फिरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार.’

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

13 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

17 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

17 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

17 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

17 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

17 तास ago