1) सध्या रोपवाटिकांमध्ये तसेच शेतकर्यांद्वारे वापरल्या जाणार्या अनेक कीटकनाशकांमध्ये मॅलेथिऑनसारखी घातक रसायने असतात जी आपल्या त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरात शिरून भयंकर परिणाम घडवू शकतात.
2)त्वचेतून खालील कारणाने विषबाधा होऊ शकते.
1) कीटकनाशकांशी झालेला प्रत्यक्ष संपर्क.
2) अंग थरथर कापणे, आकडी किंवा फिट येणे.
3) व्यक्तीचा बेशुद्धावस्थेकडे होणारा प्रवास.
काळजी कशी घ्याल (प्रथमोपचार)
1) संपर्क झालेली जागा भरपूर थंड पाण्याने नीट धुवा.
2) कपड्यांना संपर्क झाला असल्यास ते काळजीपूर्वक काढा मात्र हे करताना स्वतःच संपर्कात येऊ नका.
3) त्या व्यक्तीस धीर द्या व शांत झोपवून ठेवा.
4) तिला शक्यतितक्या लवकर दवाखान्यात न्या.
5) तिचे शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा – कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवा. कापडावर थंड पाणी घेऊन मान, पाठ व हातपाय चोळा.
6) तिला शक्यतितके थंड पाणी किंवा तसेच काही पिण्यास द्या.
7) तिला आकडी किंवा फिट येत नाही ना हे पहा.
8) व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तिला वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट स्थितीत झोपवा.
9) विषारी पदार्थाचा मूळ डबा किंवा बाटली जपून ठेवा कारण साधारणपणे त्यावरच विषावरील उतारा छापलेला असतो. आपल्या डॉक्टरांनीही ते पाहणे गरजेचे आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…