सामान्यपणे जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये सकाळी दुधाचा चहा पिण्याची पद्धत आहे. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. मात्र, दुधाचा चहा आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. अशात बरेच लोक काळा चहा पितात. अशात आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. ज्याचं सेवन करून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हा खास म्हणजे ओव्याचा चहा. ओव्याच्या चहामध्ये ॲटी ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन आढळतात.
ओव्याचा चहा पिण्याचे फायदे
१) गॅसची समस्या होईल दूर: बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात.
२) वजन कमी होत: आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा सोडून ओव्याच्या चहाचं सेवन करावं. सकाळी रिकम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने शरीरात जमा झालेलं फॅट वेगाने कमी होतं. ओव्याचा चहा प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
३) तणाव कमी होतो: आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावात असतात. अशात ओव्याच्या नियमित सेवनाने शरीराला एनर्जी मिळते आणि थकाव दूर होतो.
४) अस्थमामध्ये फायदेशीर: अस्थमासारखा आजार असलेल्या पीडित व्यक्तींनी ओव्याच्या चहाचं सेवन केलं पाहिजे. ओवा गरम असतो अशात अस्थमाच्या रूग्णांसाठी हा औषधाचं काम करतो. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने अस्थमाच्या रूग्णांना मदत मिळते.
५) सर्दी-खोकला होईल दूर: आता काही प्रमाणात थंडी जाणवायला लागली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, कफ या समस्या कॉमन आहेत. अशात तुमच्यासाठी हिवाळ्यात ओव्याच्या चहाचं सेवन करणं फार फायदेशीर ठरत असतं.
कसा बनवाल ओव्याचा चहा
ओव्याचा चहा बनवण्यासाठी 2 कप पाणी एका भांड्यात उकडून घ्या. यात अर्धा चमचा ओवा टाका आणि कमी आसेवर उकडू द्या. त्यानंतर हे पाणी नंतर एका कपमध्ये टाका आणि वरून त्यात थोडा लिंबाचा रस व थोडं मध टाका. तुमच्या ओव्याचा चहा तयार आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…
जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…