आरोग्य

ना दुधाचा चहा ना कॉफी हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा

सामान्यपणे जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये सकाळी दुधाचा चहा पिण्याची पद्धत आहे. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. मात्र, दुधाचा चहा आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. अशात बरेच लोक काळा चहा पितात. अशात आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. ज्याचं सेवन करून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हा खास म्हणजे ओव्याचा चहा. ओव्याच्या चहामध्ये ॲटी ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन आढळतात.

ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

१) गॅसची समस्या होईल दूर: बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात.

२) वजन कमी होत: आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा सोडून ओव्याच्या चहाचं सेवन करावं. सकाळी रिकम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने शरीरात जमा झालेलं फॅट वेगाने कमी होतं. ओव्याचा चहा प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

३) तणाव कमी होतो: आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावात असतात. अशात ओव्याच्या नियमित सेवनाने शरीराला एनर्जी मिळते आणि थकाव दूर होतो.

४) अस्थमामध्ये फायदेशीर: अस्थमासारखा आजार असलेल्या पीडित व्यक्तींनी ओव्याच्या चहाचं सेवन केलं पाहिजे. ओवा गरम असतो अशात अस्थमाच्या रूग्णांसाठी हा औषधाचं काम करतो. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने अस्थमाच्या रूग्णांना मदत मिळते.

५) सर्दी-खोकला होईल दूर: आता काही प्रमाणात थंडी जाणवायला लागली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, कफ या समस्या कॉमन आहेत. अशात तुमच्यासाठी हिवाळ्यात ओव्याच्या चहाचं सेवन करणं फार फायदेशीर ठरत असतं.

कसा बनवाल ओव्याचा चहा

ओव्याचा चहा बनवण्यासाठी 2 कप पाणी एका भांड्यात उकडून घ्या. यात अर्धा चमचा ओवा टाका आणि कमी आसेवर उकडू द्या. त्यानंतर हे पाणी नंतर एका कपमध्ये टाका आणि वरून त्यात थोडा लिंबाचा रस व थोडं मध टाका. तुमच्या ओव्याचा चहा तयार आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

5 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

5 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

5 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

6 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

1 दिवस ago