महाराष्ट्र

मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा; राज ठाकरेंवर कोश्यारींचा पलटवार

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषिक मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधत “राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत” असा खळबळजनक दावा केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

वरळी डोम येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी टीका करत, “लोक घाबरून अशा रटाळ प्रवचनांना येतात” असा टोला लगावला होता. सत्ता गेल्यानंतर हेच लोक येतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी म्हणाले, “संघाच्या कार्यक्रमाला आलेली सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरलेली नसतील. मी राज ठाकरेंचा सन्मान करतो, मात्र ते मोदींना जास्तच घाबरले आहेत असे मला वाटते.”

“मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. जसे प्रभू श्रीराम सर्वांना समान होते तसेच नरेंद्र मोदीही सर्वांना समान आहेत,” असा सल्ला कोश्यारी यांनी दिला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत तुम्ही आहात, घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा आरोप केल्यावरही कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली. “अजित पवार मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर टीका झाली, पण अजितदादांनी कधी माझ्यावर टीका केली नाही. मी त्यांना कधीच विसरणार नाही,” असे ते म्हणाले. घातपाताचा संशय असल्यास सरकारकडे चौकशीची मागणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

नाशिक दौऱ्यात बोलताना कोश्यारी यांनी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचा उल्लेख केला. “जसा अयोध्येत कॉरिडॉर झाला, तसाच कॉरिडॉर नाशिकमध्येही व्हावा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

8 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

14 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

14 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

14 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago