महाराष्ट्र

मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा; राज ठाकरेंवर कोश्यारींचा पलटवार

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषिक मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधत “राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत” असा खळबळजनक दावा केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

वरळी डोम येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी टीका करत, “लोक घाबरून अशा रटाळ प्रवचनांना येतात” असा टोला लगावला होता. सत्ता गेल्यानंतर हेच लोक येतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी म्हणाले, “संघाच्या कार्यक्रमाला आलेली सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरलेली नसतील. मी राज ठाकरेंचा सन्मान करतो, मात्र ते मोदींना जास्तच घाबरले आहेत असे मला वाटते.”

“मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. जसे प्रभू श्रीराम सर्वांना समान होते तसेच नरेंद्र मोदीही सर्वांना समान आहेत,” असा सल्ला कोश्यारी यांनी दिला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत तुम्ही आहात, घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा आरोप केल्यावरही कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली. “अजित पवार मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर टीका झाली, पण अजितदादांनी कधी माझ्यावर टीका केली नाही. मी त्यांना कधीच विसरणार नाही,” असे ते म्हणाले. घातपाताचा संशय असल्यास सरकारकडे चौकशीची मागणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

नाशिक दौऱ्यात बोलताना कोश्यारी यांनी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचा उल्लेख केला. “जसा अयोध्येत कॉरिडॉर झाला, तसाच कॉरिडॉर नाशिकमध्येही व्हावा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

4 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

4 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

4 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

4 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

6 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

8 तास ago