महाराष्ट्र

महाशिवरात्रीला शिवलिंगाचा असा करा अभिषेक, आणि मंदिरातून ‘या’ वस्तू नक्की घरी आणा

येत्या रविवारी, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शिव प्रथमच शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. त्यामुळेच महाशिवरात्रीला शिवलिंगावर विशेष अभिषेक करण्याचे महत्त्व आहे.

असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी मनोभावे शिवलिंगाचा अभिषेक केल्यास जीवनातील दुःख दूर होतात, ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. याचबरोबर, या दिवशी शिवमंदिरातून काही पवित्र वस्तू घरी आणल्यास पैशाची कमतरता कधीच भासत नाही, अशीही श्रद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

महाशिवरात्रीला या वस्तूंनी करा शिवलिंगाचा अभिषेक

पाणी

भगवान शिवांना पाणी अतिशय प्रिय आहे. एक तांब्या स्वच्छ पाणी अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अभिषेकाची सुरुवात पाण्याने करावी.

दूध

पाण्यानंतर थोडेसे दूध शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे जीवनात आर्थिक स्थैर्य येते, असे मानले जाते.

दही

दह्याचा अभिषेक केल्याने मानसिक ताण कमी होतो. दह्याचा थंडावा भगवान शिवांना शांत करतो आणि समस्या दूर होतात.

मध

शिवलिंगावर मध अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात सुख-समाधान मिळते तसेच आजारांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.

तूप

मुलांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर तुपाचा अभिषेक करावा.

काळे तीळ

काळ्या तीळाने अभिषेक केल्याने वाईट नजर, नकारात्मक शक्ती आणि तांत्रिक अडथळे दूर होतात, असे मानले जाते.यानंतर पार्वती माता आणि भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा करावी.

महाशिवरात्रीला मंदिरातून ‘या’ वस्तू घरी नक्की आणा

बेलपत्र

शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी घरी आणणे शुभ मानले जाते. हे बेलपत्र तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवल्यास पैशाचा ओघ कायम राहतो, अशी श्रद्धा आहे.

पार्वती मातेला अर्पण केलेल्या वस्तू

पार्वती मातेला अर्पण केलेल्या बांगड्या, चोळी किंवा सिंदूर घरी आणून परिधान केल्यास अखंड सौभाग्य, पतीला दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते, असे मानले जाते.

अभिषेकाचे पाणी

अभिषेकावेळी भगवान शिवाला अर्पण केलेले थोडेसे पाणी एका भांड्यात साठवून ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे. आजारी व्यक्तीवर हे पाणी शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago