महाराष्ट्र

त्या तरुण डॉक्टरने भुलीचे इंजेक्शन टोचून संपविले जीवन

बीड: एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भुल देण्याचे (शरूरकीयेवेळी बधीरीकरण करण्यासाठीचे) इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी (ता. २६) समोर आली. डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय २९), रा. जुजगव्हाण, ता. बीड असे या तरुण डॉक्टरचे नाव आहे.

शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर काय तो प्रकार समोर येईल, असे शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगीतले. तालुक्यातील जुजगव्हाण येथील मजूर कुटूंबातील डॉ. संजय ढवळे शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते.

तसेच, शहरातील एका दवाखान्यात निवासी डॉक्टर म्हणूनही कार्यरत होते. शनिवारी त्यांचा संपर्क होत नसल्याने मित्र व नातेवाईकांनी ते भाड्याने राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरातील खोलीचा दरवाजा ठोठावला.

मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आतमध्ये डॉ. संजय पवार यांचा मृतदेह त्यांच्या खाटेवर आढळून आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन जुजगव्हाण येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ व एक अविवाहित बहिण आहेत.

भुल देण्याचे इंजेक्शन टोचले

मृतदेहाशेजारी भुल देण्याचे इंजेक्शन (शस्त्रक्रीयेवेळी बधीरीकरण करण्याचे) निओव्हेक १० नावाचे इंजेक्शन आढळले आहे. या इंजेक्शनमध्ये व्हेक्युरोनिअम ब्रोमाईड घटक असून याचा उपयोग केवळ शस्त्रक्रीयागृहात किंवा अतिदक्षता विभागात केला जातो, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पारखे यांनी सांगीतले.

शस्त्रक्रियेदरम्यान पेशी हालू न देण्यासाठी, गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना त्यांच्या हालचाली नियंत्रित ठेवण्यासाठी हे इंजेक्शन वापरले जाते. त्याचा श्वसन यंत्रणेवर थेट परिणाम होतो. म्हणूनच त्यासोबत व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणा आवश्यक असते. रुग्णालयाबाहेर किंवा वैद्यकीय देखरेखीशिवाय वापरल्यास यामुळे काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश

जिल्हा रुग्णालयात डॉ. संजय ढवळे यांचा मृतदेह आणल्यानंतर त्यांची आई, बहिण, वडिल यांचा भाऊ यांचा मन हेलावणारा आक्रोश होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

15 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

15 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

15 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

17 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago