amol kolhe
मुंबई : शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली, तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिले आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे.
मंत्री धर्मबाबा आत्राम म्हणाले की, ‘शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. असे असले तरीसुद्धा ते कधीपण अजित पवार गटात येऊ शकतात. जिथे विद्यमान चार खासदार आमच्या पक्षाचे आहेत, त्या चार जागा आम्ही लढणारच आहोत. यासह भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जागांसह 9 जागांवर अजित पवार गटाचा दावा आहे. शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहावे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांचा चेहरा मोठा आहे. त्यामुळे शरद पवार यांना सहानभूती मिळणार नाही.’
दरम्यान, लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यात प्रत्येक पक्षाने आपापले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रक्षप्रवेशांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार, खासदारही मूळ पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच प्रत्येक पक्षाकडून अनेक मोठ-मोठे दावे केले जात आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना ठाकरे यांचा मोठा धक्का…
शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…
अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…
अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…
अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…