शिरुर (किरण पिंगळे-शेलार) ‘आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुंचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रती नेहमीच आदरच असला पाहिजे’ असे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे आमदार अॅड अशोक पवार यांनी केले. आज (दि २१) रोजी शिरुर येथील ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रात मार्गदर्शन करत गुरुचे महान कार्य करणाऱ्या सर्वांना अशोक पवार यांच्या हस्ते “गुरुरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘गुरुरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार पवार यांनी ज्यांना गुरुरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या, आई-वडील यांचे जीवनातील स्थान व गुरुविषयी आदर व्यक्त करत सर्वांना गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार अॅड अशोक पवार यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातील बी के अर्चना,शकुंतला,सुप्रिया,वासंती ,वेदिका,अमृता,पूजा,वैशाली,सुमन,पूनम,अर्पिता,सुशीला ,जीवनविद्या मिशनचे शामकांत वर्पे, हभप रामदास महाराज फडके, हभप ज्ञानेश्वर महाराज रासकर, महेश रासने, सनातन संस्थेच्या पंचफुला सोनटक्के या सर्वांना ट्रॉफी, शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरुर शहर महिलाध्यक्षा डॉ स्मिता कवाद, युवती शहरध्यक्षा गिता आढाव, सामाजिक कार्यकर्त्या शोभना पाचंगे, सुनंदा घावटे, सागर नरवडे, बिजवंत शिंदे, अॅड रविंद्र खांडरे, जेष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष सुरेश पाचर्णे, निलेश पवार, अमोल चव्हाण, भाग्यश्री लिंगे, कल्पना चांदगुडे, रोहिणी रासकर, शिला पाचंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिरुर येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) व रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप
रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित निलेश खाबिया व अनिल बांडे यांचा सत्कार
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…