गुरुंकडून मिळालेले ज्ञान खरी संस्कार शिदोरी: महेश ढमढेरे

शिक्रापूर (शेरखान शेख): गुरुंकडून मिळणारी ज्ञानरुपी संस्कार शिदोरी हीच खरी यशाची गुरुकिल्ली असून मुलांनी आई वडिलांप्रमाणे शिक्षक व गुरुजनांचा आदर करावा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश ढमढेरे यांनी केले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या गुरुजन गौरव समारंभात बोलताना महेश ढमढेरे बोलत होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक नवले हे होते तर यावेळी प्रा. डॉ. पराग चौधरी, प्रा. मीनाक्षी पोकळे, प्रा. किशोर आढाव, प्रा. डॉ. संदीप सांगळे, डॉ. डी. सी. वाबळे, डॉ. अमेय काळे, प्रा. विष्णू गिरमकर, डॉ. विवेक खाबडे, प्रा. सुमेध गजबे, डॉ. पद्माकर गोरे, प्रा. अजिता भूमकर यांसह आदी उपस्थित होते, आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आजच्या बदल्यात जीवनशैलीत गुरुजनांमुळेच संस्कार आणि आदर्श टिकून आहेत. विद्यार्थ्यांनी गुरुंकडून शक्य तेवढे ज्ञान आत्मसात करून यशस्वी जीवनाचा पाया पक्का करावा तसेच शालेय जीवनात शिक्षकांविषयी प्रेम आणि आदरभाव रुजण्याची गरज आहे. आपल्या आई वडिलांप्रमाणेच शिक्षकांविषयी आदराची भावना ठेवली तर सुसंस्कृत आणि आदर्श समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असे देखील महेश ढमढेरे यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाच्या जीवनातील शिक्षण आणि शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित करत गुणवत्ता व ज्ञानाची कास धरणारा शिक्षक वर्ग आपल्या महाविद्यालयात असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्राचार्य डॉ. अशोक नवले यांनी सांगितले. तर यावेळी प्रा. डॉ. पराग चौधरी, प्रा. मीनाक्षी पोकळे, प्रा. किशोर आढाव यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

13 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

17 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

17 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

17 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

17 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

17 तास ago