शिरूर तालुका

स्वर्गीय संतोषबापू गांधींचे काम उल्लेखनीय; अभिजित अनाप

शिक्रापूर (शेरखान शेख): अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून स्वर्गीय संतोषबापू गांधीं यांनी त्यावेळी केलेले सर्व काम उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांनी ठेवावी असे मत सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित स्वर्गीय संतोषबापू गांधी स्मृती पुरस्कार प्रसंगी बोलताना सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप बोलत होते, यावेळी सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप, ग्राहक पंचायतचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड, मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी, मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटन मंत्री रमेश टाकळकर, शिक्रापूर भैरवनाथ मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राजाभाऊ मांढरे, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर, उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा संघटन मंत्री भानुदास सरडे, जिल्हा कोषाध्यक्ष राघवदास चौधरी, शिरूर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप, जिल्हा सहसंघटक तुकाराम फराटे, जिल्हा कार्यकारीणी सदस्य दिलीप बेंद्रे, महीला संघटक लताताई यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्वर्गीय संतोष बाप्पू गांधी स्मृती पुरस्कार उत्कृष्ट अधिकारी म्हणून अधिक्षक सह धर्मादाय आयुक्त अभिजीत अनाप यांना पुरस्कार देण्यात आला असून आंबेगाव तालुक्याला उत्कृष्ट तालुका पुरस्कार तर पुणे जिल्हा सचिव संतोष शिर्के, दौंड शहराध्यक्ष गणेश जगताप यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार, पद्माताई पासलकर यांना उत्कृष्ट महिला कार्यकर्ती पुरस्कार, रोहिणी दरेकर यांना उत्कृष्ट महिला संघटन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, दरम्यान रमेश टाकळकर यांनी स्वर्गीय संतोषबापू गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी त्यावेळी केलेली आंदोलने, कामे, शासकीय कार्यालयांना केलेले पत्रव्यवहार, शासकीय कार्यालयात त्यांची घेतलेली दखल यांसह अनेक गोष्टींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना प्रशासनामध्ये काम करत असताना काय अडचणी येतात हे सांगत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य खूप मोठे असून निरपेक्ष भावनेने कार्यकर्ते काम करत असल्याचे देखील सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दिलीप निबाळकर यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

3 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

3 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

4 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

9 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

9 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

9 तास ago