शिरूर तालुका

मुखईत विद्यार्थ्यांना मिळाला परीक्षेसाठीचा कानमंत्र

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला असून यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचा कानमंत्र मिळाला आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालया येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बॉश कंपनीचे जनरल मॅनेजर मुकुंद कराडखेडकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश के. डी. भोसले, संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष अशोक पलांडे, संस्थेचे संचालक सदानंद मोरे, मंगेश मोरे, प्राचार्य तुकाराम शिरसाट, मुख्याध्यापक सुधिर ढमढेरे, डॉ राजेद्र ढमढेरे यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाची योग्य निवड, शिस्तबद्ध जीवन, यशाला शॉर्टकट नसतो, आरोग्यदायी जीवन आणि वाचनाची जोपासना या बाबी नमूद करत या माध्यमातून सुसंस्कृत माणूस तर घडू शकेलच परंतु तुमचे उज्वल भविष्य नक्कीच घडेल असा आशावाद मुकुंद कराडखेडकर व्यक्त केला. तर निवृत्त जिल्हा न्यायाधीश के. डी. भोसले यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव व्यक्त करत आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रेरित झालो तर यश नक्कीच मिळते ही प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली.

दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आलेख मांडत संस्थेला मदत करणाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गोगावले यांनी केले, तर प्रास्ताविक प्राचार्य तुकाराम अर्जुन शिरसाट यांनी केले आणि रेखा काळे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

3 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

3 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

3 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

3 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

3 तास ago