रामनवमीच्या शुभपर्वावर ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’चे नूतनीकरण, शिरूरच्या सेवाभावी इतिहासाला उजाळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामनवमीच्या पावन दिवशी शिरूर शहरात समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि राजकारण यांमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे यांच्या सन्मानार्थ नामित ‘डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’च्या फलकाचे नूतनीकरण करण्यात आले. या प्रसंगाने शिरूरच्या सेवाभावी परंपरेला उजाळा देत नव्या पिढीला प्रेरणादायी वारसा पुढे नेण्याची साक्ष पटवली.

शहराच्या सेवाभावी इतिहासाचे अधिष्ठान: डॉ. बाळासाहेब नरवडे हे केवळ एक कुशल दंतचिकित्सक नव्हते, तर गरिबांसाठी नि:स्वार्थी वैद्यकीय सेवा देणारे समाजसेवक होते. त्यांनी “देतात तेवढंच घ्या” या तत्त्वावर उपचार करत, माणुसकीचे व्रत जोपासले. त्यांच्या हवेलीचे रूपांतर एक सामाजिक व राजकीय केंद्रस्थानात झाले होते. इथेच अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्यात माजी मुख्यमंत्री मा. शरद पवार साहेब यांचेही काही काळ वास्तव्य होते.

‘डॉ. नरवडे मार्ग’ — गौरवाचे प्रतीक: सुमारे ३० वर्षांपूर्वी जाकीरखान पठाण, तुकाराम खोले व शरद कालेवार यांच्या पुढाकारातून, डॉ. नरवडे यांचे सुपुत्र गोविंद नरवडे यांच्या अनुमतीने, शहरातील एका रस्त्याला ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्ग’ असे नाव देण्यात आले. या नामकरणाचा भव्य समारंभ तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते पार पडला होता.

रामनवमीच्या दिवशी डॉ. नरवडे यांचे नातू सागर नरवडे आणि पंतु यशराज नरवडे यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याच्या फलकाचे नूतनीकरण केले. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले.

या समारंभास तुकाराम खोले, सुनील जाधव, मयुर नाहार, एजाज बागवान, मंगेश खांडरे, योगेश थोरात, शुभम शाहणे, पंकज जाधव, अविनाश घोगरे, परेश काळे, राहुल भोते, किरण काळे, अजित ठोंबरे, अस्लम शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने डॉ. नरवडे यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या जीवनमूल्यांचा वारसा जपण्याचे आश्वासन दिले.

नरवडे कुटुंबाचा उज्ज्वल वारसा: “सर्वजण आपलेच” या भावनेने प्रेरित होऊन, नरवडे कुटुंबाने समाजात कधीही भेदभाव न करता कार्य केले. आज त्यांची चौथी पिढी — श्रीहरी, सागर, जयकुमार, दत्ता — हा वारसा पुढे नेत आहे. विशेषतः सागर नरवडे हे शिरूर शहराच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींमध्ये सक्रीय असून, कुटुंबाचा लौकिक वृद्धिंगत करत आहेत. पंतु यशराज व आदित्य ही युवा पिढीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रेरणादायी कार्यात सहभागी आहे. समाजसेवेच्या स्मृतीचे: डॉ. बाळासाहेब नरवडे यांचे जीवन हे शिरूरच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. त्यांच्या स्मृतीस वंदन करत, त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करणाऱ्या कुटुंबीयांना समाजातून, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago