Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या

शिंदोडी (तेजस फडके) महसुल दिनाच्या पुर्व संध्येला महसूल विभागाने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे पथक तयार करत चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात बेसुमार वाळूउपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकाने उडवुन दिल्या.

शिरुर तसेच श्रीगोंदा महसूल आणि पोलिस प्रशासनाने हि संयुक्त कारवाई केली. न्हावरे येथील मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांनी या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगत तीन ठिकाणी घोड नदीपात्रात पथक उतरवले. या पथकाने स्वयंचलित बोटीच्या साह्याने पाठलाग करत वाळु माफियांच्या यांत्रिक बोटी गाठल्या. या पाठलागचा थरार काही जागरुक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. त्यानंतर वाळू माफियांच्या दोन बोटी आणि दोन फायबर जिलेटिनच्या साह्याने उडवून देण्यात आले.

या कारवाई पथकात मंडलाधिकारी नंदकुमार खरात, प्रशांत कांबळे, राजू बडे, योगेश टिळेकर, आदित्य गायकवाड, अक्षय तांबट, हर्षद साबळे, रुपेश रोट्टी, श्रीकांत आढाव, भालचंद्र पंडित, संदीप ढमढेरे, आलिशा महाकाळ यांच्यासह शिरुर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटायचय; आत सोडणारा खाजगी व्यक्ती सांगतोय मोबाईल बाहेर ठेवा

शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

16 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

20 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

20 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

20 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

20 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

20 तास ago