पुणे (प्रतिनिधी) पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या बदलीच्या विरोधात पंकज देशमुख यांनी कॅट अर्थात सेंट्रल ॲडमिनीस्ट्रेट ट्रिब्युनलकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी कॅटमध्ये आज (दि. ६) सुनावणी पार पडली. सुनावणी झाल्यानंतर कॅटने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना पुणे पोलीस अधीक्षक पदावरून मुक्त करण्यात येऊ नये, असे आदेश दिले.
कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार एखाद्या अधिकाऱ्याची मुदतपूर्व बदली करताना त्याचे कारण देणे आवश्यक आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर काही उपायुक्त अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता होती. गुरुवारी रात्री गृहविभागाकडून काही पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पंकज देशमुख यांची पुणे पोलीस अधिक्षकपदी सात महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. देशमुख यांची मुदतपूर्व बदली करताना कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची बदली करता येणार नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे पुणे पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुखच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु
शिरुर शहरात गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी लवकरच बैठक; प्रशांत ढोले
शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…