पुणे (प्रतिनिधी) पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या बदलीच्या विरोधात पंकज देशमुख यांनी कॅट अर्थात सेंट्रल ॲडमिनीस्ट्रेट ट्रिब्युनलकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी कॅटमध्ये आज (दि. ६) सुनावणी पार पडली. सुनावणी झाल्यानंतर कॅटने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना पुणे पोलीस अधीक्षक पदावरून मुक्त करण्यात येऊ नये, असे आदेश दिले.
कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार एखाद्या अधिकाऱ्याची मुदतपूर्व बदली करताना त्याचे कारण देणे आवश्यक आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर काही उपायुक्त अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता होती. गुरुवारी रात्री गृहविभागाकडून काही पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पंकज देशमुख यांची पुणे पोलीस अधिक्षकपदी सात महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. देशमुख यांची मुदतपूर्व बदली करताना कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची बदली करता येणार नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे पुणे पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुखच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु
शिरुर शहरात गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी लवकरच बैठक; प्रशांत ढोले
शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…