rajendra-dhaybar
वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचयातीच्या उपसरपंचपदी राजेंद्र रामदास धायबर यांची मंगळवारी (ता. २५) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वाघाळे ग्रामस्थांसह परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सरपंच अनिता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेविका शितल भालशिंग यांनी पाहिले. तत्कालीन उपसरपंच दादा सोनवणे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला व राजेंद्र धायबर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला नवले, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघ संघालक लहू थोरात, सरपंच अनिता गावडे, राजाराम भोसले, नंदा शेळके, अनिता शेळके, विकास कारकुड, नरसिह घोलप, अशोक सोनवणे, सुहास काटे, संदीप धायबर, संदीप शेळके, किसन गोरडे, अमोल धरणे, वैभव गावडे, रामदास शेळके, विजय घोलप, राजू थोरात, राजेंद्र जगताप, आनंदराव सोनवणे, एकनाथ डफळ, राजू माकर, ओमकार थोरात, पांडुरंग घोलप, हिम्मत थोरात, प्रवीण शेळके, अजिंक्य थोरात, फक्कड थोरात आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सुहास काटे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप धायबर यांनी उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र धायबर यांचा सत्कार करण्यात आला.
‘सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली गावचा सर्वांगीण विकास करणार आहे.’
– नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र धायबर.
वाघाळे! अशोकराव सोनवणे पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड…
शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप
Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…
वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!
कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!
शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…
पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…