शिरूर तालुका

राष्ट्रवादी! बापाशी कृतघ्न होवून गद्दारी करायची आमची सवय नाही…

शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील निष्ठावंत आक्रमक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर तालुक्यातील ४२ गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. १९) कवठे येमाई येथे संपन्न झाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

शेतमालाचे बाजारभाव पडल्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा, टोमॅटो, दूध, भाजीपाल्याचे कोट्यावधींचे नुकसान झाले असून यास येथील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आम्ही कोणत्याही गटाचे नाही, आम्ही मुळ राष्ट्रवादी पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून जे बाजूला गेले त्यास गट म्हणा आणि जे शरद पवार यांचे बरोबर आहेत ते मुळ पक्षाचे आहेत, अशी टीका निकम यांनी केली.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, निवृत सीईओ प्रभाकर गावडे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्या अरुणा घोडे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, बन्सीशेठ घोडे, मल्हारी काळे, नाना फुलसुंदर, बाळासाहेब डांगे, शरद बोंबे तसेच शिरूर-आंबेगाव मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूरच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची उघड एन्ट्री…
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिरूरमधील ४२ गावांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याने बहुतांशी नेते उघडपणे स्पष्ट भूमिका जाहीर करत नव्हते. मात्र या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक गावांतील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही, आजवरच्या विकासाचे शिल्पकार शरद पवार हेच आहेत, याचे श्रेय कुणी घेऊ नये असा टोला लगावत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शरद पवार यांना सोडून गेलेल्या नेत्यांसाठी १९४२ ला ब्रिटिशांविरुद्ध चले जाव ची चळवळ सुरू झाली याची आठवण करून देत ४२ गावांतील लोकांनी गद्दार राज्यकर्त्यांना चले जाव चा नारा द्या असे आवाहन जगन्नाथ शेवाळे यांनी केले. पक्षातील प्रमुख नऊ मंत्र्यांबद्दल नवग्रहाची उपमा देत त्यांच्या प्रमुखासोबत या दहतोंडी रावणाचे दहन करण्याची वेळ आल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

अमोल कोल्हे यांनी बोलताना देशात शिरूर मतदार संघातील कामांच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. संसदरत्न पुरस्काराचे खरे मानकरी मतदार संघातील मायबाप जनता आहे. प्रेमाने काहीही ऐकू पण जर बोट दाखविले तर हात काढून हातात देण्याचे पाऊल उचलावे लागेल असे सांगितले. पक्ष फुटी बाबत बोलताना पहिल्या दिवशी चूक झाली, माहित नव्हते फक्त नेत्याने बोलवले म्हणून आदेशाचे पालन केले. मी त्यांना नेता मानतो म्हणून तिथे गेलो. मात्र तिथे काही वेगळेच झाले. बापाशी कृतघ्न होवून गद्दारी करायची आमची सवय नाही, असेही ते म्हणाले.

शिरुर तालुक्यातील स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी निलेश चव्हाण यांची निवड

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची राष्ट्रवादीकडून घोषणा…

राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत

राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ साजरा; आंदोलन करत गद्दारांचा केला निषेध…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

22 मिनिटे ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

28 मिनिटे ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

33 मिनिटे ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

39 मिनिटे ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

2 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

2 तास ago