शिरूर तालुका

सुभाष विद्यामंदिरच्या सवंगड्यांची ३६ वर्षानंतर भरली शाळा

कासारीतील हिराबाई गायकवाड विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात तळेगाव ढमढेरे येथील सुभाष विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला असल्याने शालेय सवंगड्यांची तब्बल ३६ वर्षांनंतर शाळा भरल्याचे दिसून आले.

hotel matoshree ranjangaon ganpati

कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे तळेगाव ढमढेरे गावातील जुन्या सुभाष विद्यामंदिर या शाळेमध्ये १९८४ ते १९८५ साली दहावीला असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी व समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, माणिक काळकुटे, उद्योजक संतोष हबडे, बाळासाहेब दरेकर, सुरेश ढमढेरे, विजय जेधे, प्रकाश तकटे, संतोष गुंदेचा, मच्छिंद्र नरके, उषा भुजबळ, राजाराम साबळे, डॉ. हेमंत दातखिळे, मनोरमा खेडकर, नीलिमा ढमढेरे, दिलीप सातपुते, महादू रासकर आदींनी आयोजित केला होता. सर्व शालेय मित्र तब्बल ३६ वर्षानंतर एकत्र आल्याने सर्वांचेचेहेरे आनंदी तर काहिशा भांबावलेल्या अवस्थेत होते. माजी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, वकील, डॉक्टर, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कंपनीतील अधिकारी, प्रगतशील शेतकरी असा संगम झाला आहे. कार्यक्रमात सुभाष विद्या मंदिरचे तत्कालीन मुख्याध्यापक अंकुश पठारे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी यावेळी सुभाष विद्यामंदिरचे तत्कालीन शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक वि. ल. पाटील, प्रभाकर मुसळे, दत्तात्रय गायकवाड, टेमगिरे सर, सेवक चंदूकाका, कासारी येथील हिराबाई गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सरोदे, ज्येष्ठ अध्यापिका नसीमा काझी, राजाराम साबळे, अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात, राहूल आल्हाट, हेमंत पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या वतीने माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले, तर माजी विद्यार्थी व गुरुजनांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र नरके यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. राजेंद्र ढमढेरे यांनी केले आणि अरुण भुजबळ यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

11 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

18 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

18 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

18 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

19 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

20 तास ago