बहुमत नव्हे, उत्तरदायित्वच लोकशाहीची खरी ताकद! संसदेत सरकारने जनतेला जाब द्यायलाच हवा

मुंबई: भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे संसद. ती केवळ कायदे मंजूर करणारी संस्था नाही, तर जनतेच्या सार्वभौम इच्छेचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च घटनात्मक व्यासपीठ आहे. सरकारच्या निर्णयांची छाननी, राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संवाद आणि शासनाला उत्तरदायी धरण्याची प्रक्रिया संसदेतूनच घडते. त्यामुळे संसदेत चर्चा होणे आणि सरकारने जनतेच्या प्रतिनिधींसमोर आपल्या निर्णयांचा हिशेब देणे, ही […]

अधिक वाचा..

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावांचा लिलाव होत असल्याची चर्चा अत्यंत दुर्दैवी असून, हा संपूर्ण सहकार चळवळीवर कलंक असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. कोरेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायट्यांच्या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधानमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, “हे सरकार शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेले निष्ठूर सरकार आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्यांना लाठ्यांनी उत्तर देणे ही लोकशाहीची गळचेपी […]

अधिक वाचा..

लोकशाही वाचवा निर्धार सभा; नागरिकत्व आणि लोकशाही धोक्यात असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित “लोकशाही वाचवा निर्धार सभा” मध्ये केंद्र सरकारवर लोकशाही संस्थांवर आघात केल्याचा आरोप करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणा प्रभारी मीनाक्षी नटराजन यांनी “वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकत्व चोरीचे संकट देशासमोर उभे ठाकले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे,” असे आवाहन केले. […]

अधिक वाचा..

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून विजय मिळवला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात […]

अधिक वाचा..

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला असला तरी दक्षिण भारतातील जनतेने भाजपाचा विभाजनवादी विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

अधिक वाचा..

जनतेचे प्रश्न विचारणे म्हणजे देशाची बदनामी नव्हे; तेच लोकशाहीचे कर्तव्य; ॲड. अमोल मातेले

मुंबई: विरोधी पक्षांनी देशातील जनतेच्या अडचणी, महागाई, बेरोजगारी, गॅस व इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा सरकारच्या धोरणांवर टीका केली की लगेच त्याला “देशाची बदनामी” असे नाव देणे ही सत्ताधाऱ्यांची सोयीस्कर भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे […]

अधिक वाचा..

सौर प्रकल्पासाठी वृक्षतोड; सांगलीत लोकशाहीच्या उत्सवावर बहिष्कार

तासगावच्या बलगवडे गावात दुपारपर्यंत एकही मतदान नाही मुंबई: एकीकडे सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह दिसत असताना, तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांनी मात्र लोकशाहीच्या या उत्सवावर बहिष्कार टाकत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गावात उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ संपूर्ण गावाने मतदानाकडे पाठ फिरवली […]

अधिक वाचा..

न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत लोकशाही सुरक्षित

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार मुंबई: “न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी […]

अधिक वाचा..

ठाणे-मुंबईत वाढता मतदानाचा टक्का; लोकशाही उत्सवात नागरिकांचा सहभाग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ठाणे: राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून […]

अधिक वाचा..