उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि चैतन्य हेल्थ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको-व्हीलेज यांच्यात सामंजस्य करार

शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेस चालना देणारा महत्त्वपूर्ण करार मुंबई: नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त संवर्गातील प्राध्यापक व अध्यापकांच्या प्रशिक्षणास अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हा करार […]

अधिक वाचा..

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत; दादाजी भुसे यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई: दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या […]

अधिक वाचा..

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य; आयपीएस बिरदेव डोणे

सिंधुदुर्ग: अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व उल्लेखनीय ठरेल. विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा रायगड जिल्ह्यातील डोंगरी भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आयपीएस बिरदेव डोणे यांनी केले. ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने व ऑल इंडिया धनगर समाज […]

अधिक वाचा..

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने “डॅशबोर्ड” विकसित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये गंगा एज्युकेशन सोसायटीच्या बांधकामस्थळी अपघात; मजुराचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील थापेमळा भागात (दि. २२) एप्रिल रोजी दुपारी २. २० वाजता एक दुर्दैवी घटना घडली. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर प्लास्टरचे काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. मृत मजुराचे नाव अखिलेश कुमार (वय ४५) असून ते मुळचे बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील मुन्दिपुर गावचे रहिवासी होते. सध्या ते शिरूर […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभाग समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठिशी

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी होणार मुंबई: विद्यार्थी हे दैवत असून राज्यातील शासकीय शाळांमध्ये समर्पित वृत्तीने काम करणारे अनेक शिक्षक आहेत. राज्य शासन अशा शिक्षकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून सर्वच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी केली जाणार असून येत्या वर्षभरात शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये […]

अधिक वाचा..
school-teacher

एन.एम.एम.एस. परीक्षेत कालिकामाता विद्यालय वाघाळेचे घवघवीत यश!

वाघाळेः केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालयाने बाजी मारली आहे. कालिकामाता विद्यालयाचे 15 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी एका विद्यार्थिनीस केंद्र शासनामार्फत 12 हजार रुपये प्रतिवर्ष असे चार वर्षात एकूण […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध

महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार मुंबई: उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी *महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला […]

अधिक वाचा..

निलेश वाळुंज यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची अण्णापूर शाळेला तातडीने भेट

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षणाच्या दयनीय परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी उचललेल्या आवाजानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून अन्नापुर ता. शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षकाच्या जागा रिक्त होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. संबंधित शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे निलंबनाची कारवाई उशिराने झाली, मात्र नवीन शिक्षक नेमण्यास शिक्षण […]

अधिक वाचा..

ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा ढिसाळ कारभार, जिल्हा परिषद पुणेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष

सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापूरसह अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे त्याचा विद्यार्थाच्या शिक्षणावर विपरीत परीणाम होत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले असून, शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर झाला आहे. वरीष्ठांना याचे […]

अधिक वाचा..