इतर

UPI युजर्सना मोठा झटका: पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता लागणार चार्ज

मुंबई: तुम्हीही अनेकदा UPI द्वारे पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया UPI आधारित निधी हस्तांतरणावर शुल्क आकारु शकते. यामुळे भविष्यात UPI मधून पैसे ट्रान्सफर करणे महागात पडू शकते. RBI कडून पेमेंट ट्रान्सफरचा खर्च काढून टाकण्याचा विचार केला जात आहे.

शुल्क आकारणीसाठी लोकांकडून सल्ला
शुल्क आकारणीसाठी लोकांकडून सल्ला घेण्यात येत आहे. यासाठी RBI कडून ‘डिस्कशन पेपर ऑन चार्जेस इन पेमेंट सिस्टम’ जारी करण्यात आला आहे. RBI ने शुल्क आकारण्याबाबत लोकांकडून सल्लाही मागितला आहे. मध्यवर्ती बँकेच्या वतीने या पेपरमध्ये असे म्हटले आहे की, ऑपरेटर म्हणून रिझर्व्ह बँकेला RTGS मध्ये मोठ्या गुंतवणुकीची आणि ऑपरेटिंग खर्चाची भरपाई करावी लागेल.

UPI वर होणारा खर्च घेणार
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार त्यात जनतेचा पैसा गुंतवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, त्याची किंमत काढून टाकणे आवश्यक आहे. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटमध्ये आकारले जाणारे शुल्क म्हणजे RTGS हे कमाईचे साधन नाही, असेही RBI ने स्पष्ट केले. परंतु भविष्यात ही सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहावी यासाठी UPI वर खर्च केला जाईल.

रिअल टाइम फंड ट्रान्सफरची सुविधा
UPI पेमेंट ट्रान्सफरसाठी रिअल टाइम ट्रान्सफरची सुविधा देते. त्याचप्रमाणे, ते रिअल टाइम सेटलमेंट देखील निश्चित करते. ही संपूर्ण यंत्रणा तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्याची आणि निधी हस्तांतरण कोणत्याही जोखमीशिवाय चालवण्याची गरज आहे. त्यासाठी खर्चही खूप होतो. मोफत सेवेच्या स्थितीत महागड्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आणि बनवण्याचा मोठा खर्च कोण उचलणार, असा सवालही RBI ने केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या या प्रश्‍नांवरुन हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात UPIमधून निधी हस्तांतरित करणे महागडे ठरु शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सलग 25 वेळा तिरंगा फडकावत मोदींच्या नावावर नवा विक्रम; विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’चा संकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा…

2 तास ago

२ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर होणार; ‘आधी मोजणी, मग रजिस्ट्री’ची नवी व्यवस्था

मुंबई : जमिनीवर प्रत्यक्ष वहिवाट आणि ताबा असतानाही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या राज्यातील…

2 तास ago

सरकार कुणाचेही असो, रामदास आठवले यांचे मंत्रीपद निश्चित? फडणवीसांनी आठवलेंच्या शैलीत सादर केली कविता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे…

2 तास ago

स्वातंत्र्यदिनी शिवसेनेला मोठा धक्का; नर्मदाताई वैतींसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

मिरा-भाईंदर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी…

2 तास ago

मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते; सोनिया गांधींचीही परवानगी, पण मनमोहन सिंगांच्या भूमिकेमुळे प्रवेश रखडला

मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला…

2 तास ago

बीडमध्ये धक्कादायक प्रकार; विलास घुले यांच्या पत्नीने वृत्तवाहिनीसमोरच केले विषप्राशन

बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग…

2 तास ago