शेजाऱ्याने तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलंय? घाबरू नका, अशा प्रकारे जमीन परत मिळते

महाराष्ट्र

औरंगाबाद: शेजाऱ्याने जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर प्रक्रिया काय आहे? तलाठ्याकडे तक्रार करण्यापासून ते अधिकृत मोजणी, तहसीलदाराचा आदेश आणि न्यायालयाचा मार्ग यांसारख्या टप्प्यांची माहिती दिली.

१) संशय आला? पहिली नोंद तलाठ्याकडेच करा

जमिनीचा तुकडा गेल्याचा आढळला की तलाठी कार्यालयात एक साधी लेखी तक्रार द्या. त्यात या गोष्टी लिहा.

सर्वे/गट नंबर

मूळ सीमारेषा

अंदाजे गेलेली जमीन

दोन्ही शेतांचे तपशील

तलाठी लगेच जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी करेल.

२) सरकारी मोजणी – हेच तुमचं मुख्य शस्त्र

वादाचा खरा निकाल मोजणीच ठरवते. तहसील कार्यालयात अधिकृत मोजणीसाठी अर्ज करा. मोजणी अधिकारी आधुनिक DGPS/ETS मशीनने

सीमारेषा अचूक मोजतात

कोणाची किती जमीन कुठे गेली हे स्पष्ट करतात

हा अहवाल न्यायालयातही पुरावा म्हणून टिकलाच टिकतो!

३) तहसीलदारांचा आदेश – तुमच्या बाजूने निर्णय आला तर काय

मोजणी अहवाल तुमच्या बाजूने असेल तर तहसीलदारांकडे ताबा परत मिळवण्यासाठी अर्ज करा. तहसीलदार

दोन्ही बाजू ऐकतात

मोजणी अहवाल तपासतात

आणि चुकीने गेलेली जमीन परत देण्याचा आदेश देतात

४) प्रत्यक्ष जमीन परत मिळताना काय होते

हा टप्पा जरा महत्वाचा आणि उत्साहवर्धक असतो! सरकारी पथक (तलाठी + मंडळाधिकारी + पोलीस) जागेवर येतात आणि ते

सीमारेषा पुन्हा निश्चित करतात

नवीन खूणदर्शक/खांब बसवतात आणि जमीन प्रत्यक्ष तुम्हाला परत देतात

शेजारी विरोध केला तर कायदेशीर सक्तीने ताबा घेतला जातो.

५) तरीही प्रश्न सुटला नाही? मग न्यायालय

खूप मोठा वाद असेल किंवा निर्णय चुकीचा वाटत असेल तर न्यायालयात अतिक्रमण विरोधी दावा दाखल करता येतो. न्यायालय पाहते

जमीन कागदपत्रे

मोजणी अहवाल

7/12 नोंदी

साक्षी पुरावे आणि अंतिम आदेश देते.