औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे.
ई-केवायसी न केल्यास काय होईल
तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं
रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत
नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकते.
थेट ५ लाखांचा तोटा होऊ शकतो
म्हणूनच लगेच ई-केवायसी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे!
ई-केवायसी करण्याचे ४ सोपे पर्याय
ओटीपी पडताळणी
फिंगरप्रिंट
आयरीस स्कॅन
फेस ऑथेंटिकेशन
तुम्ही मोबाईलमधून किंवा जवळच्या सीएससी सेंटरमधूनही सहज _ई-केवायसी_ करू शकता.
Ayushman App वरून ई-केवायसी करण्याची प्रक्रिया
Google Play Store उघडाAyushman Bharat Digital Mission / ABHA / Ayushman App शोधा
अधिकृत ॲप डाउनलोड करा
ॲपमध्ये लॉगिन प्रक्रिया
ॲप उघडा आणि भाषा निवडा
मोबाइल नंबर टाका
आलेला OTP टाकून लॉगिन करा
ई-केवायसी कशी करायची
Ayushman Card / Generate Ayushman Card वर क्लिक करा
Complete e-KYC पर्याय निवडा
Aadhaar OTP Verification निवडा
आधार क्रमांक टाका
UIDAI कडून आलेला OTP टाका
तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल
आयुष्मान कार्ड कसं मिळणार
e-KYC पूर्ण झाल्यानंतर Generate Ayushman Card वर क्लिक करा
काही सेकंदात डिजिटल आयुष्मान कार्ड तयार होईल