तुमच्याकड आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा..

महाराष्ट्र

औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे.

ई-केवायसी न केल्यास काय होईल

तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं

रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत

नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकते.

थेट ५ लाखांचा तोटा होऊ शकतो

म्हणूनच लगेच ई-केवायसी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे!

ई-केवायसी करण्याचे ४ सोपे पर्याय

ओटीपी पडताळणी

फिंगरप्रिंट

आयरीस स्कॅन

फेस ऑथेंटिकेशन

तुम्ही मोबाईलमधून किंवा जवळच्या सीएससी सेंटरमधूनही सहज _ई-केवायसी_ करू शकता.

Ayushman App वरून ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

Google Play Store उघडाAyushman Bharat Digital Mission / ABHA / Ayushman App शोधा

अधिकृत ॲप डाउनलोड करा

ॲपमध्ये लॉगिन प्रक्रिया

ॲप उघडा आणि भाषा निवडा

मोबाइल नंबर टाका

आलेला OTP टाकून लॉगिन करा

ई-केवायसी कशी करायची

Ayushman Card / Generate Ayushman Card वर क्लिक करा

Complete e-KYC पर्याय निवडा

Aadhaar OTP Verification निवडा

आधार क्रमांक टाका

UIDAI कडून आलेला OTP टाका

तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल

आयुष्मान कार्ड कसं मिळणार

e-KYC पूर्ण झाल्यानंतर Generate Ayushman Card वर क्लिक करा

काही सेकंदात डिजिटल आयुष्मान कार्ड तयार होईल