उपराष्ट्रपती निवडणुकीचे बिगुल वाजले; ‘या’ दिवशी मतदान

नवी दिल्ली: देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला असून, या घोषणेसोबतच राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. जगदीप धनखर यांनी आरोग्याच्या कारणावरून उपराष्ट्रपतीपदाचा 21 जुलै 2025 रोजी राजीनामा दिला. त्यांच्या अचानक राजीनाम्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले […]

अधिक वाचा..

अखेर मुंडे-कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्याची बीडमध्ये एन्ट्री

बीड: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे कुटुंबाची मागणी मान्य केली आहे. फडणवीसांच्या आदेशानंतर आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरूवारी (ता.31) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी […]

अधिक वाचा..

देशातील सर्व संस्था हाती घेऊ पहाणाऱ्या अदानी व अंबानींच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज; हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीयकृत बँकांत परदेशी गुंतवणूक देशासाठी धोक्याची घंटा, बँकांचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद होण्याच्या मार्गावर: विश्वास उटगी मुंबई: इंदिराजी गांधी यांनी १९६९ साली बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामागे एक महत्वाचे कारण होते. देशातील आर्थिक स्रोतांचा ताबा त्यावेळी मुठभर लोकांच्या हातात होता व ही शक्ती लोकशाहीवरही ताबा मिळवू पहात होती, यातून हा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता […]

अधिक वाचा..

१ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी दिनांक ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १ ऑगस्ट पासून या कंपन्यांनी ₹3.00 प्रति किलो लिटर (बेंचमार्क दरापेक्षा) सवलतीचा दर देण्यास सुरु केले आहे. त्यामुळे महामंडळास […]

अधिक वाचा..

महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा

मुंबई: महसूल विभाग हा शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा विभाग आहे. सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्राच्या राजधानीत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा उपयोग करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात श्रीमती गोयल यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कार्य […]

अधिक वाचा..

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन

पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी मुंबई: हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. […]

अधिक वाचा..

भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्याची मागणी

मुंबई: काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंट्याल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी नेमकं काय म्हंटले. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर बोलताना कैलास […]

अधिक वाचा..

मुंडे-महाजनांमुळे भाजप सोडावा लागला, माजी मंत्री अण्णा डांगे यांची खंत

मुंबई: ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे माझी भाजपमध्ये छळवणूक झाली आणि पक्ष सोडावा लागला, अशी खंत माजी मंत्री अण्णा डांगे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी अतिशय परखडपणे आपली व्यथा […]

अधिक वाचा..

महादेव मुंडे प्रकरणात ४ जणांना बेड्या, बडा मासा गळाला लागल्याची शक्यता

बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता असून हत्या प्रकरणी चार जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. यामुळे मुंडे हत्या प्रकरणाला आता गती मिळाल्याचे पाहण्यास मिळत […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यानं आयुष्य संपवलं, राजकारणात मोठी खळबळ

जळगाव: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे […]

अधिक वाचा..