दिविजा वृद्धाश्रमार्फत मोफत मोबाईल दंत चिकित्सक फिरता दवाखाना

कणकवली तालुक्यातील असलदे, कळसुली, नांदगाव येथे शिबिर तळेरे: असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून दिविजा वृद्धाश्रम असलदे, ग्रामपंचायत कळसुली व नांदगाव उर्दू शाळा येथे दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 150 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. दिविजा वृद्धाश्रम कोकणातील ग्रामीण भागातील खेड्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते. समाजातील गोर-गरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणारी कोकणातील एकमेव […]

अधिक वाचा..

श्रीवर्धनमधील उबाठाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी बांधले घड्याळ हाती…

१६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग मुंबई: १६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्या सोबत येत आहात हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर प्रवेशाबद्दल मत व्यक्त केले. १९९५ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला श्रीवर्धन राहिला होता. त्यावेळी राजकीय संघर्ष […]

अधिक वाचा..

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी 1 ते 8 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

मुंबई: नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. नोंदणी व […]

अधिक वाचा..

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिष्टमंडळाची भेट

मुंबई: आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, सरचिटणीस रोहित सावंत व इमरान तडवी, सचिव वैभव पांचाळ व संकेत वाडेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांची जंजिरा बंगल्यावर भेट घेऊन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी व गोंधळासंदर्भात सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र राज्यात ७ जूनपासून सुरू झालेली अकरावी […]

अधिक वाचा..

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येणार

मुंबई: दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने विविध उपक्रम राबवित असून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काल सुसंगत व्यापक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या […]

अधिक वाचा..

वसतिगृहांसाठी तातडीने जागा निश्चित करा; मंत्री अतुल सावे

मुंबई: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये वसतिगृहासाठी अद्याप भाडेतत्त्वावर जागा निश्चित करण्यात आलेली नाही, त्या जिल्ह्याचा तातडीने योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण […]

अधिक वाचा..

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक

मुंबई: राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल, असे […]

अधिक वाचा..

निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मारुती चितमपल्ली सरांनी आपले संपूर्ण आयुष्य […]

अधिक वाचा..

राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक

मुंबई: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच सर्व पारंपरिक विद्यापीठांची संयुक्त बैठक आयोजित करू तसेच राज्याच्या कृषिमंत्र्यांसह राज्यातील कृषी विद्यापीठांना भेट देऊन तेथील संशोधनाची विस्तृत माहिती […]

अधिक वाचा..

मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू

मुंबई: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. […]

अधिक वाचा..