wellary-viral-video

Video! आजी-आजोबाच्या प्रेमाची इनसाईड स्टोरी; माधुकरी मागून जगतात…

छ. संभाजीनगर : सोनाराच्या दुकानातील आजी-आजोबांचा Video सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आपल्या वयोवृद्ध पत्नीसाठी सोन्याचा दागिना खरेदी करण्याची आजोबांची धडपड पाहून महाराष्ट्र गहिवरला आहे. प्रतिक्रियांच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संबंधित आजी-आजोबा माधुकरी मागत जीवन जगतात. त्यांचा एक मुलाचे निधन झाले असून, दुसरा मुलाला दारूचे व्यसन आहे. आजी-आजोबा माधुकरी मागत […]

अधिक वाचा..

मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याच्या मुदतीत वाढ; असे करा घरबसल्या तुमचा आधार अपडेट..

संभाजीनगर: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांना एक मोठी खूशखबर दिली आहे. तुमचे आधार तपशील मोफत ऑनलाईन अपडेट करण्याची अंतिम मुदत आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मोफत अपडेट कसे कराल सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या आधार नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा “Document Update” किंवा “Update Demographics Data” […]

अधिक वाचा..
wellary-viral-video

आजोबांचं प्रेम, आजींची स्वप्नपूर्ती अन् मनाचा मोठेपणा; Video तुफान व्हायरल…

छत्रपती संभाजीनगर : पत्नीला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकले. संबंधित Video पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे. माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. सर्वांना मदत करावी आणि सर्वांबरोबर माणुसकीने वागावे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुंबई: मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इंद्रायणी पुल […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे पदविका (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून […]

अधिक वाचा..

शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली

मुख्यमंत्र्यांनी पालघरमधील जि. प. शाळा दुर्वेस येथील विद्यार्थ्यांचे केले स्वागत  पालघर: गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश […]

अधिक वाचा..

सरकारी कामासाठी कोणी लाच मागितल्यास येथे करा तक्रार

संभाजीनगर: जर तुमच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर घाबरून न जाता किंवा लाच न देता तुम्ही थेट एसीबीकडे तक्रार करू शकता. एसीबी तुम्हाला पूर्ण सहकार्य करते आणि तुमची ओळख गुप्त ठेवते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार कशी करावी टोल-फ्री क्रमांक 1064 – २४x७ उपलब्ध. कॉल करून तक्रार सविस्तर सांगा. व्हॉट्सअँप क्रमांक […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा

मुंबई: शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती

मुंबई: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात हे प्रादेशिक विभाग […]

अधिक वाचा..

शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून […]

अधिक वाचा..