कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करणार

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.यावेळी त्यांनी ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. […]

अधिक वाचा..

अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी मिळणार, अदिती तटकरेंची घोषणा 

संभाजीनगर: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. कुपोषण कमी करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी केंद्रांचे गुणात्मक मूल्यमापन केले जाणार आहे. या मूल्यांकनानुसार खालीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास ₹1400 10 पैकी 8 […]

अधिक वाचा..

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा

मुंबई: प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मंत्रालयात कंपनी प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. सरनाईक बस […]

अधिक वाचा..

कोरोना पुनरागमन; काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे उपाय

गेल्या तीन वर्षापासून आपण सर्वांनी कोरोना विषाणूपासून दिलासा अनुभवला आहे, परंतु काही भागांमध्ये प्रमुखांयाने मुंबई मध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काळजी घेणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करणे ही काळाची गरज आहे. कोरोनाचा धोका आणि आपली जबाबदारी कोरोना विषाणू सतत बदलत आहे, ज्यामुळे त्याचे नवीन प्रकार उद्भवू शकतात. अशा वेळी, आरोग्याचे संरक्षण […]

अधिक वाचा..

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे; मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई: आपत्ती काळात राज्य शासनामार्फत मदत व बचाव कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येते. आपत्तीमध्ये शासन व प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता नागरी आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणाऱ्या यंत्रणांनी या काळात सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या. मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या […]

अधिक वाचा..

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर सर्वोत्तम करिअर पर्यायांची निवड करा 

संभाजीनगर: 12वीचा निकाल लागला आहे आणि आता पुढे काय करायच. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य वाटा खुल्या आहेत. पूर्वी विज्ञान म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच मानलं जायचं. पण आता तंत्रज्ञान, संशोधन, पर्यावरण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक हाय इन्कम क्षेत्रांमध्ये करिअरची दारे उघडली आहेत. चला जाणून […]

अधिक वाचा..

युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी

मुंबई: मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळेच […]

अधिक वाचा..

आमच्याकडे विलिनीकरणाबाबत प्रस्तावच नाही किंवा कशातच काही नाही…

आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या स्तरावर अस्तित्वात नाही. त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ; सुनिल तटकरे मुंबई: राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्यांचे जरुर पक्षात स्वागत आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची शिफारस

कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी कायदा करून महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण करावा-डॉ. नीलम गोऱ्हे  मुंबई: महाराष्ट्रातील वाढत्या गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म सेवा कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ठोस कायदे व धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे. निशा पनवर,डॉली गुप्ता,नीरजा भटनागर या सामाजिक विकास तज्ञ […]

अधिक वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी प्रशासकीय मान्यता

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासननिर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे. सदर आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात […]

अधिक वाचा..