स्पर्धा परीक्षेत हमखास विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे…

भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई भारताची राजधानी कोणती ? ⇒ दिल्ली भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ⇒ तिरंगा भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ⇒ त्रिमुख सिंह भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ⇒ सत्यमेव जयते भारताचे राष्ट्रगीत कोणते ? […]

अधिक वाचा..

कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा…

मुंबई: कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार भाजपा युतीला घरचा रस्ता दाखवा अन्यथा…

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील १० वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा घणाघाती हल्लाबोल […]

अधिक वाचा..
sharad-pawar-devdatta-nikam

आमदार पळवण्यात आंबेगावचे कारभारी सहभागी: शरद पवार

बारामती (प्रतिनिधी): “मोठ्या विश्वासाने मी त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.” पक्षफुटीच्या वेळेस आपले ५४ पैकी ४४ आमदार पळवले आणि ते पळवण्यात आंबेगावचे आमदारही सहभागी होते’ अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्यावर […]

अधिक वाचा..

पक्षपाती पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग का हटवत नाही

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ हटवा मुंबई: विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या असतानाही निवडणूक आयोगाने अद्याप पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले नाही. काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली, यात महागाई व बेरोजगारी दूर करण्यातील महायुतीचे अपयश उघड केले आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसने ‘ आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत सरकारवर आवश्यक वस्तूंच्या दरवाढीवर थेट प्रहार करण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलपासून गहू-तांदुळासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्रातील सामान्य […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र शासन अंगणवाडी मुख्य सेविका भरतीला सुरुवात; त्वरित अर्ज करा….

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे अंगणवाडी मुख्य सेविका या पदांची सरळ सेवा भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2024 आहे. या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना परमनंट नोकरीची संधी उपलब्ध होणार […]

अधिक वाचा..

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे कार्यालय मित्तल हॉस्पिटल इमारतीत स्थलांतरित

मुंबई: मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह, मुंबई – 400002’ या पत्त्यावर […]

अधिक वाचा..

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्याच्या प्रयत्नांबद्दल स्पेनच्या पंतप्रधानांकडून महाराष्ट्राची प्रशंसा

मुंबई:- महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ (Pedro Sanchez) यांनी प्रशंसा केली आहे. विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याशी काल (दि २९) येथील राजभवनमध्ये चर्चा करतांना श्री सांचेझ यांनी डॉ गोऱ्हे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासासाठी जिल्हा स्तरावर कोणकोणत्या प्रकल्पांना उत्तेजन दिले जाते, याबद्दलही माहिती घेतली. […]

अधिक वाचा..

लक्ष्मीपूजन नेमकं कधी, आज की उद्या, पाहा योग्य तिथी…

यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काही लोक म्हणतात दिवाळी आज 31 ऑक्टोबर तर काही जण म्हणतात उद्या 1 नोव्हेंबरला आहे. यामागे सर्व घोळ हा दोन दिवस प्रदोष काळात अमावस्या तिथी आल्यामुळे झाला आहे. अशात महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कधी करायचं याबद्दलचा गोंधळ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दूर केलाय. दिवाळी कधी आहे […]

अधिक वाचा..