जितेंद्र आव्हाड यांना दणका, दोन कट्टर शिलेदार राष्ट्रवादीत

अभिजीत पवार यांच्या प्रवेशानंतर काहीजण मार्ग काढायला सरसावले ;अगोदर काय गोट्या खेळत होता का मुंबई: अभिजीत पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहींचे कॉल येत होते… तू कुठे आहेस… आपण बसू… मार्ग काढू… अरे आता कधी मार्ग काढणार… अगोदर काय गोट्या खेळत होतात का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार […]

अधिक वाचा..

लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल

रडायचे नाही लढायचे, काँग्रेस विचार घराघरात पोहोचवून सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवू: हर्षवर्धन सपकाळ  मुंबई: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला पण विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]

अधिक वाचा..

महायुती सरकारचा कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण

मुंबई: महायुती सरकारमध्ये कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे प्रकार उघड होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमधून पैसा खाऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा उद्योग महायुती सरकारने केला आहे. कापूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या आशिर्वादाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने संगनमताने ८०.९९ कोटींच्या खरेदीत […]

अधिक वाचा..

या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा

कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत महायुती सरकारकडून ४१ कोटींचा भ्रष्टाचार मुंबई: तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शिर्षका खाली काढून ७७ कोटी रुपयांची खिरापत वाटून ४१.५९ […]

अधिक वाचा..

सरकारची इभ्रत वाचवायची असेल तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा; विजय वडेट्टीवार

गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करू नये नागपूर: महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. […]

अधिक वाचा..

नॅनो खतांसह सर्व कृषी साहित्याची खरेदी ही नियमानुसार व मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच

मुंबई: दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट

मुंबई: महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया, वरवर आकर्षक वाटणारे बजेट केवळ गोलमाल

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत चमकदार अंदाजात सादर करुनही अर्थसंकल्प समाधानकारक झाला नाही, या बजेटने गुंतवणूकदार प्रभावित झाले नाहीत. तसेच शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकाचीही निराशाच केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि शेतमालाच्या हमीभावाबदद्लही काहीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया व गोलमाल आहे, अशी […]

अधिक वाचा..

आता तर मनसेला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व देखील नाही

मुंबई: विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल… आपल्या पक्षात कार्यकर्ते… पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का यावर आत्मचिंतन करावे असा […]

अधिक वाचा..

अजितदादांची कार्यकर्त्यांसाठी शिस्त, निकटवर्तीयांसाठी सूट 

मुंबई: राज्याच्या राजकारणात एक नवा विनोद चर्चेत आहे. शिस्त फक्त कार्यकर्त्यांसाठी, पण निकटवर्तीयांना मोकळीक!” अजितदादा नेहमीच कार्यकर्त्यांना कडक शिस्त पाळण्याचे धडे देतात, त्यांना वचनबद्ध राहण्याची शिकवण देतात आणि त्यांच्या चुकांसाठी रागावतात. पण हेच दादा त्यांच्या निकटवर्तीयांच्या बाबतीत मात्र चक्क माफी देतात. असे म्हणतात, “दादांचा आवाज जसा कडक, तसे नियमही कडक – पण फक्त निवडकांसाठीच!” कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..