मुख्य बातम्या

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिक्रापुर (प्रतिनिधी) ‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरीकांचे प्रश्न सुटणार हा देखावा असून, वास्तविक गेले पाच वर्ष नागरकांची प्रशासनाकडून पिळवणूक होत आहे. आमदारांकडून न सुटलेले प्रश्न मी सोडवणार आहे, असे चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे.

चंदन सोंडेकर हे विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. श्री. सोंडेकर म्हणाले, ‘आमदारांनी आघाडी सरकार असताना शिरुर-हवेलीत मर्जीतील अधिकारी बसवले आहेत. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा धंदा चालू आहे. अनेक अधिकारी आमदारांच्या समन्वय समिती बैठकीत गैरहजर असतात. शिरूर तालुक्यात एजंट आणि पैसे दिल्याशिवाय प्रशासनात नागरीकांची कामेच होत नाहीत. केवायसी ऑनलाईन साधे रेशन कार्ड मिळत नाहीत. आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती झाली आहे.’

‘विरोधी पक्षात स्व. आमदार बाबुराव पाचर्णे यांची कमतरता निश्चितच जाणवत आहे. नागरीकांच्या हजारो तक्रारी प्रशासनात प्रलंबित आहेत. भुमी अभिलेख म्हणजे ज्याचे पैसे त्याची मोजणी, चर्तुसिमा त्याचा ताबा असा धंदा चालू आहे. महावितरण म्हणजे फक्त आमदारांच्या कार्यकर्त्यांनाच डीपी ती सुद्धा फक्त सणसवाडीतच. शिरुर हवेलीत 100 पैकी 99 गावात अंधार आहे. शिरूर तालुक्यात अनेक समस्या आहेत. आमदारांकडून न सुटलेले प्रश्न मी सोडवणार असून, जनतेससाठी 24 चोवीस तास उपलब्ध राहणार आहे, असे श्री. सोंडकर यांनी म्हटले आहे.

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

शिरुरच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; अजुनही काहीजण इच्छुक

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ…

शिरुर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देणार का…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

6 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

6 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

6 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

6 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

6 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

6 तास ago