sharad pawar dilip walse patil
मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये अनेकजण प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा होती. पण या बातम्या निराधार आणि खोडसाळ असल्याचे सांगत दिलीप वळसे-पाटील यांनी ही चर्चा फेटाळळी आहे.
शरद पवार यांना आपण भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळ आहेत. माध्यमांमध्ये याबाबत सुरू असलेल्या बातम्या या चुकीच्या आहेत. सध्या आपण मतदारसंघात दौऱ्यावर असून दिवसभर ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहोत, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, शरद पवार यांचे मानसपुत्र समजले जाणारे दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि ते अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने वळसे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघात दोन सभा घेतल्या होत्या. त्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनाही वळसे पाटील यांच्या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे.
आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांनी तयारी सुरू केली असून, त्याला शरद पवार यांनी बळ दिल्याचे समजत आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.
दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण
दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…
दिलीप वळसे पाटील यांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार? शरद पवार म्हणाले…
दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…
अजित पवार यांना धक्का! दिलीप वळसे पाटील परतीच्या मार्गावर…
दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चांना उधाण…
ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…
वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…