शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील लंघेवस्ती, मडके आळी येथे नागरीकांना दळणवळणासाठी गेले कित्येक वर्षापासून पुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तेथील ओढयाला पाणी असल्यामुळे विदयार्थ्यांना गावातील शाळेत जाण्यासाठी, शेतीमालाची वाहतुक करण्यासाठी, दुध वाहतुक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मोठा वळसा घालून नागरीकांना ये -जा करावी लागत होती.
या ओढयावर असणारा छोटा पुल वाहून गेल्याने पुलापलीकडील लंघे वस्ती, मडके आळी यांचा गावापासून काही दिवस संपर्क तुटला होता. घटनास्थळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भिमाशंकर सह. कारखान्याचे चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील यांनी भेट दिली होती. त्यांनी संबंधित आधिकाऱ्यांना सुचना देत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, नवनाथ शेळके यांना तात्काळ इस्टीमेट करण्याच्या सुचना देत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
सविंदणे गावच्या सरपंच सोनाली खैरे, उपसरपंच अभिजित लंघे, शुभांगी पडवळ, माजी सरपंच वसंत पडवळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी पाठपुरावा करत दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ३८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर मंजूर केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी पेढे वाटून समाधान व्यक्त केले आहे.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…