शिरूर तालुका

अनेक वर्ष रखडलेल्या सविंदणे येथे पुलाच्या कामासाठी निधी मंजूर

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील लंघेवस्ती, मडके आळी येथे नागरीकांना दळणवळणासाठी गेले कित्येक वर्षापासून पुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तेथील ओढयाला पाणी असल्यामुळे विदयार्थ्यांना गावातील शाळेत जाण्यासाठी, शेतीमालाची वाहतुक करण्यासाठी, दुध वाहतुक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मोठा वळसा घालून नागरीकांना ये -जा करावी लागत होती.

या ओढयावर असणारा छोटा पुल वाहून गेल्याने पुलापलीकडील लंघे वस्ती, मडके आळी यांचा गावापासून काही दिवस संपर्क तुटला होता. घटनास्थळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भिमाशंकर सह. कारखान्याचे चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील यांनी भेट दिली होती. त्यांनी संबंधित आधिकाऱ्यांना सुचना देत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, नवनाथ शेळके यांना तात्काळ इस्टीमेट करण्याच्या सुचना देत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

सविंदणे गावच्या सरपंच सोनाली खैरे, उपसरपंच अभिजित लंघे, शुभांगी पडवळ, माजी सरपंच वसंत पडवळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी पाठपुरावा करत दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ३८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर मंजूर केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी पेढे वाटून समाधान व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

1 तास ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

1 तास ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

1 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

23 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

23 तास ago