शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील कविता संदीप धायबर यांना महिला सबलीकरण व उन्नतीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘आदर्श महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो टायर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कारादरम्यान कविता धायबर यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. या सन्मान सोहळ्याला अंजुम चोप्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कविता धायबर यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल शिरूर तालुक्यातून कविता धायबर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
View this post on Instagram
वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!
वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड
वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…