आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता करा…

भाजप आमदाराचा भाजपला घरचा आहेर; विकास निधी मिळत नसल्याची तक्रार… मुंबई: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता भाजपने करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य […]

अधिक वाचा..

त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला…

मुंबई: महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून गावातील वातावरण शांत आहे […]

अधिक वाचा..

भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध: नाना पटोले

मुंबई: महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर […]

अधिक वाचा..

कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल, भाजपाला मात्र नॅनो कारमध्ये बसावे लागेल

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले […]

अधिक वाचा..

शिरुर विधानसभेचा भाजपाचा उमेदवार कोण?

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर विधानसभेच्या जागेची नेहमीच वेगवेगळी चर्चा होत असून अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीकडे सदर जागा राहिलेली असताना काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले असल्याने आता पुढील काळात शिरुर विधान सभेचा भारतीय जनता भारतीय उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरुर विधानसभा मतदार […]

अधिक वाचा..

काँग्रेसची भूमिका स्पष्ट, भाजपाविरोधात लढण्यासाठी जे एकत्र येतील त्यांच्यासह लढू…

मुंबई: राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो, तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणणाऱ्या भाजपाला निडणुकीतून धडा शिकवा

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. गारपीट झाली, शेतकरी ढसाढसा रडतोय त्याला मदत देत नाही पण जाहीरातींवर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकारच्या चुकीच्या धोणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहापटिने वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे […]

अधिक वाचा..

बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा कारवाई करु मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कड कारवाई केली जाईल, […]

अधिक वाचा..

शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करु 

जळगाव: शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

भाजप कार्यकर्त्याला आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी अंबादास दानवे आक्रमक

मुंबई: दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्याला स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने मारहाण केल्याचा मुद्दा आक्रमकपणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडून याप्रकरणी सरकारने खुलासा करावा, तसेच संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून असाच एकप्रकार दहिसर मध्ये समोर आला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यात राज्यात […]

अधिक वाचा..