साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम होतो

साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृदय हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. साखर कमी केल्याने तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत. शरीराची […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास होऊ शकतात हे गंभीर परिणाम

आवश्यक पोषणतत्त्वांमध्ये व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते हाडांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, रोगप्रतिकारक यंत्रणा समर्थनासाठी आणि शरीराच्या विविध कार्यांचे नियमन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जगभरात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत आणि काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची इतकी कमतरता असते की त्यांच्या व्हिटॅमिन डीच्या पातळीची संख्या एका आकड्यात असते. तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळी […]

अधिक वाचा..

मजबूत हाड होण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला कोणता धोका होतो…

कॅल्शियम हे एक असं खनिज आहे, जे हाडं आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासह स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील कार्य करते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. दातही कमी वयात पडतात, किंवा दातांचा त्रास होऊ लागतो. यासह हृदयाचे आजार आणि शरीर […]

अधिक वाचा..

मोहरीच्या तेलात लवंग मिक्स केल्याने शरीरातील या समस्या लगेच होतील दूर

मोहरीचं तेल बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं. बरेचजण जेवणही यातच बनवतात. या तेलाने टेस्ट तर वाढतेच, सोबतच हे तेल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. तसेच लवंगही खूप फायदेशीर असते. वेगवेगळ्या उपचारांमध्ये लवंगचा वापर केला जातो. अशात जर तुम्ही मोहरीचं तेल आणि लवंगचा एकत्र वापर केला तर आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळू शकतात. या मिश्रणाने […]

अधिक वाचा..

आतड्यांमध्ये काही गडबड असेल तर शरीरात दिसतात ही लक्षण

आपल्या पचन तंत्रात आतड्यांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आतड्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले पाहिजे. आतड्यांमध्ये काही गडबड झाली सामान्यपणे आपल्याला समजत नाही. अनेकदा जर काही वेगळं जाणवलं तर सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. नंतर समस्या अधिक वाढते. अशात आतड्या खराब झाल्यावर शरीरात कोणती लक्षण दिसतात. आतड्या खराब होण्याची लक्षण १) […]

अधिक वाचा..

आपल्याकडे एवढ ऊन असूनही शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता का असते

काही मोजक्या भागांचे अपवाद सोडले तर भारतात बहुतांश ठिकाणी बारा महिने भरपूर सुर्यप्रकाश असतो. उन्हाळ्यात तर उन्हाचा कडाका विचारायलाच नको, पण एरवीही अगदी नको- नको होऊन जातं एवढं ऊन आपल्याकडे असतं. व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सुर्यप्रकाश, सकाळचं कोवळं ऊन हा एक सर्वोत्तम स्त्रोत आहे, असं म्हणतात. मग असं असताना बहुसंख्य भारतीयांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची एवढी […]

अधिक वाचा..

जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो

हृदय व श्वासोच्छ्वासाला चालना: वेगाने चालण्यामुळे तुमचे हृदय आणि फुप्फुसे मजबूत होतात. त्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि तुमच्या कार्य करण्याची क्षमता वाढवण्याला त्यामुळे चालना मिळते. रक्तदाब नियमन: या व्यायाम प्रकारामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. सांध्यांची लवचिकता सुधारते: वेगात चालण्याने तुमच्या सांध्यांची लवचिकता सुधारून, कडकपणा कमी होतो. मधुमेह व्यवस्थापन: वेगात चालण्याच्या कृतीने रक्तातील […]

अधिक वाचा..

सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा येतो तर मग रोज हा १ पदार्थ खा

१) खसखसचा काढा: सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही […]

अधिक वाचा..

आपल्या शरीरातील ‘चार संप्रेरके’ कोणती

१. एंडॉर्फिन्स २. डोपामाईन ३. सेरोटोनिन ४. ऑक्सिटोसिन आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे. एंडॉर्फिन्स आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते. मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण एंडाॅर्फिन्स आपल्याला […]

अधिक वाचा..