फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडियावरून दिली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र सरकारच्या सहकार्याने […]

अधिक वाचा..

दिल्लीत सचिन अहिर यांची केंद्रीय मंत्र्यांशी बैठक; मुंबईच्या पुनर्विकास, रेल्वे आणि मिठागरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

मुंबई: मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनी, रेल्वेच्या जागा, मिठागरांचा विकास आणि विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या या दौऱ्यात विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती अहिर […]

अधिक वाचा..

दिल्लीत शिवसेनेची रणनीती बैठक; अधिवेशनात आक्रमक भूमिका ठरली

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पक्षाची भूमिका, मांडणीची रणनीती आणि सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशासमोरील आव्हानांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारा आर्थिक परिणाम, पुरवठा साखळीतील […]

अधिक वाचा..

गल्लीतून दिल्लीपर्यंत! सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल

मुंबई: भारतीय लोकशाहीत प्रतिनिधित्वाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहोचवणे आणि वंचित समाजघटकांना निर्णयप्रक्रियेत स्थान देणे ही खरी लोकशाहीची कसोटी आहे. अशा पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी उपेक्षित, वंचित दलित समाजातून आलेल्या, उच्चशिक्षित आणि समाजकार्यात सक्रिय असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण […]

अधिक वाचा..

दिल्लीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पश्चिम बंगालवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; निर्मला सीतारमण यांची टीका

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका करत सभागृहात राजकीय वातावरण तापवले. बजेटमध्ये पश्चिम बंगालचा उल्लेख नसल्याचा टीएमसी खासदार सौगत राय यांनी केलेला आरोप फेटाळून लावताना सीतारमण म्हणाल्या, “पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे राज्य […]

अधिक वाचा..

पवार परिवारात बदलाचा क्षण! अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना

मुंबई: बारामतीतील अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. शपथविधी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडली, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास या […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी सोमवारी दिल्लीत बोलावली खासदारांची महत्वपूर्ण बैठक

रविवारी रात्रीच शिवसेना खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसेनानींचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत केला गौरव

महात्मा गांधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते राजगुरु, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या दोन दिवसीय अधिवेशनाला नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजयेंद्र गुप्ता, केंद्रीय पर्यटन मंत्री […]

अधिक वाचा..

जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण…

मुंबई: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मराठ्यांची पोरे आता थांबणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचेही ऐकणार नाहीत, अशी मनःस्थिती समाजाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला […]

अधिक वाचा..