शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या […]

अधिक वाचा..

लोकसभेतील फक्त दोन खासदारांनी नाकारला पगार

नवी दिल्ली: खासदारांना मिळणारा पगार आणि विविध भत्त्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा या विषयावर वेगवेगळ्या पक्षांतील खासदार पक्षभेद विसरून एकत्र येताना दिसतात. मात्र सध्याच्या लोकसभेत याला अपवाद ठरतील असे दोन खासदार आहेत. त्यांनी खासदार म्हणून मिळणारा पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, सध्याच्या लोकसभेत केवळ दोन खासदारांनी आपला पगार न घेण्याचा […]

अधिक वाचा..

हिम्मत असेल तर लोकसभा लढा; डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे गणेश नाईक यांना थेट आव्हान

अंबरनाथ: ठाणे-कल्याणच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दांची तलवार उपसली गेली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत नाईक यांना खुले आव्हान दिले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. जनतेने त्यांना […]

अधिक वाचा..

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव; शरद पवार गटाच्या खासदारांच्या सह्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण

दिल्ली: एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा रंगात असताना, दिल्लीत मात्र शरद पवार गटाच्या खासदारांनी वेगळीच राजकीय भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या तीन खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची […]

अधिक वाचा..

लोकसभेत ‘हल्ल्याचा प्लॅन’ वाद: मोदींसह आणखी एक खासदार टार्गेटवर असल्याचा पीयूष गोयल यांचा दावा

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी लोकसभेत घडलेल्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा कथित प्लॅन आखल्याचा धक्कादायक दावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आणखी एक गंभीर दावा करत वादाला नवे वळण […]

अधिक वाचा..

लोकसभा दणाणली! कळीच्या मुद्द्यांवर चर्चेला टाळाटाळ करणाऱ्या सरकारविरोधात इंडिया आघाडी आक्रमक

नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली. सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ […]

अधिक वाचा..

गेल्या पाच वर्षांत देशात किती सरकारी शाळा बंद? लोकसभेत प्रश्न, शिक्षण मंत्र्यांनी दिले आकडे

नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांत देशभरातील सरकारी शाळांमध्ये काही प्रमाणात बदल झाला असून, अनेक शाळा बंद किंवा विलीन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. या आकडेवारीमुळे विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकसभेत उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बिहारचे […]

अधिक वाचा..

लोकसभेत मोठा पराभव, विधानसभेत गेम कसा फिरला? महायुतीच्या बड्या नेत्यानं सगळं सांगितलं

मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं आलं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात […]

अधिक वाचा..

त्यांनी नौटंकी करण्याऐवजी त्यांच्या खासदारांनी लोकसभेच्या अधिवेशनात परराष्ट्र मंत्र्यांसमोर निषेध नोंदवावा 

नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव… मुंबई: जितेंद्र आव्हाड यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून करावी असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला आहे. दरम्यान नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव आहे असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी […]

अधिक वाचा..
Leader

कल्याण लोकसभा क्षेत्रातील महत्वाचे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी घेतली बैठक

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ […]

अधिक वाचा..