ज्या भाषेने यूपी, बिहारवाल्यांचं भलं केलं नाही त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भांडत आहे 

मुंबई: आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

मुंबई: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी एका मोठ्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उद्यापासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर

‘निर्धार नवपर्वाचा’, ‘पदाधिकाऱ्यांशी संवाद’ ;चार दिवसात आठ जिल्हे पिंजून काढणार… मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उद्यापासून (१८ जुलै) चार दिवसाच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून ‘निर्धार नवपर्वाचा’ पदाधिकारी संवाद मेळाव्याचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. आज पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. दिनांक १८ […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ‘या’ गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

गडचिरोली: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मारकनार गावात सरकारी बस सेवा सुरू झाली, जे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते. गावात पहिल्यांदा बस पोहोचल्यानंतर गावलकऱ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला.या सेवेचा फायदा आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना होईल.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मारकनार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू झाली, याचे श्रेय गडचिरोली पोलिसांना […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार; हर्षवर्धन सपकाळ

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळा मुंबई: मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला महत्त्व नाही पण…

नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला फारसे महत्त्व नाही, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारतात ब्राह्मण समाजाचे फार चालते, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाह्मण समाजाचे नेते आहेत. तरी, गडकरी यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नागपूर […]

अधिक वाचा..

सोमवारी महाराष्ट्र बंद! सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात मोठा एल्गार 

मुंबई: राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारच्या कर धोरणांविरुद्ध इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने 14 जुलै 2025 बंद पुकारला आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत, यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटले आहे की, सरकारने काही […]

अधिक वाचा..

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान…

जागतिक वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांसह सर्वच किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धनासह त्यांचे महत्व नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया… मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात मराठी अस्मितेबरोबरच, मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात; रमेश चेन्नीथला

राज ठाकरे यांच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे. मराठी हिंदी वाद व […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्र २०४७ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे; उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ६ मे २०२५ ते दिनांक २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र २०४७ करिता ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. ‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी ‍विधानसभेतील सर्व सदस्यांनी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

अधिक वाचा..