ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती

मुंबई: ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल असा विश्वास परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. मुंबईमध्ये आज “Wheels of Change – Understanding EV Adoption for Mumbai’s Auto & […]

अधिक वाचा..

मुंबईत पत्रकारांसाठी राष्ट्रीय कार्यशाळा; नूतनीकरणीय ऊर्जा विषयावर माहितीची पर्वणी

मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघ आणि इंटरन्यूजच्या ‘अर्थ जर्नलिझम नेटवर्क’ (EJN) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नूतनीकरणीय ऊर्जेवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पत्रकार व संवादकांना प्राधान्य दिले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत आहे. भारताने […]

अधिक वाचा..

मुंबईत खड्डेमय उड्डाणपुलांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

मुंबई: सोमवार (दि. 25) ऑगस्ट मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो नागरिक येथे प्रवास करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील बहुतांश उड्डाणपूल व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. हे उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) च्या अखत्यारीत येतात. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतुकीची भीषण कोंडी निर्माण होते. यामुळे दररोज […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीची तिसरी बैठक पार

नवाब मलिकांनी घेतला संघटनेचा आढावा.. मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्तर मुंबईची मालाड येथे बैठक पार पडली. मुंबई महानगरपालिका निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सोपवल्यावर आज तिसरी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी मुंबई मनपासाठी कंबर कसली; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांचा धडाका सुरू…

मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक आज समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, […]

अधिक वाचा..

मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतला आढावा, नदी काठच्या परिसरात यंत्रणा सज्ज

मुंबई: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. मुंबईतील मिठी नदीची आणि नदी काठच्या परिसराचा आढावा घेतला तसेच विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण परिसराची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट, नाकर्त्या व निष्क्रिय कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आसूड

मुंबई पावसाळा सुरू होताच दरवर्षी पाण्यात बुडते, रस्ते खड्ड्यांनी पोखरले जातात, वाहतूक ठप्प होते आणि नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही तेच वास्तव सायन-माटुंगा, वडाळा चार रस्ता, चेंबूर, दादर, भायखळा यांसारख्या ठिकाणी दिसून आले. आज या सर्व परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस व आमदार रोहितदादा पवार, मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि युवक मुंबई […]

अधिक वाचा..

जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण…

मुंबई: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मराठ्यांची पोरे आता थांबणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचेही ऐकणार नाहीत, अशी मनःस्थिती समाजाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला […]

अधिक वाचा..

मुंबईत घर नाही सांगून बंगला न सोडणाऱ्या मुंडेंचा चौपाटीवर आलिशान फ्लॅट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे मंत्रिपद गेल्यानतंरही अजून सरकारी निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यात राहतायत. पाच महिन्यानंतरही त्यांना बंगला रिकामा न केल्यानं मंत्री भुजबळ सध्या वेटिंगवर आहेत. प्रकृती बरी नसल्यानं उपचारासाठी मुंबईत राहणं आवश्यक असल्याने बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं. मात्र गतवर्षी विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना गिरगाव चौपाटीवर असलेल्या […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

मुंबई: भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, […]

अधिक वाचा..