सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवार

यवतमाळ: विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यावर एका मागून एक संकट येत आहे. सोयाबीनच्या पिकाला हमीभाव मिळत नाही तशात येलो मोझॅक या रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक देखील उद्धवस्त झालेलं आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत सरकारने करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेलोना गावातील शेतात […]

अधिक वाचा..

राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीने मदत पुरवण्याचे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश

ठाणे: मराठवाड्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शिंदे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे […]

अधिक वाचा..

सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का मुंबई: देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला […]

अधिक वाचा..

महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा

मुंबई: महसूल विभाग हा शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा विभाग आहे. सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्राच्या राजधानीत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा उपयोग करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात श्रीमती गोयल यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कार्य […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना एक वर्षाची कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक: संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातील एकटविलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी […]

अधिक वाचा..

भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ, मुल दूध पित नसतील तर ‘हे’ पदार्थ खाऊ घाला

हाडं बळकट होण्यासाठी मुलांनी दूध प्यायला पाहिजे असं अनेक महिलांचं म्हणणं असतं, पण मुलांना नेमकं दुधाचंच वावडं असतं. काही मुलांना दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते दूध प्यायला टाळाटाळ करतात. अशावेळी मुलांना कॅल्शियम मिळणार कसं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यांना इतर काही पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता ज्यातून त्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर १५ दिवसांत खुलासा द्यायचा आदेश…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये किंमतीच्या भंगाराची परस्पर विल्हेवाट, फूटपाथ व पूररेषेतील अतिक्रमणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांनी शिरूर नगर परिषदेस […]

अधिक वाचा..

देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये, आयोगाने वस्तुनिष्ठ खुलासा करावा

‘बटेंगे तो कटेंगे’वाल्या देवेंद्र फडणविसांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये, भाजपाची विचारसरणीच विभाजनवादी मुंबई: भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. बोगस मतदार याद्या बनवूण, मतांची चोरी करून भाजपा सत्तेत आली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह हा घोटाळा कसा केला गेला याची मांडणी […]

अधिक वाचा..

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान द्या

मुंबई: राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी २० […]

अधिक वाचा..

विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार

मुंबई: दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती परिवार मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक ह.पि.तुम्मोड […]

अधिक वाचा..