‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक विकास साधणे, हीच महायुती सरकारची भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. “कुणाचाही हक्क काढून न घेता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,” असे सांगत सामाजिक सलोखा आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. परभणीत आयोजित शेतकरी […]

अधिक वाचा..

मुंबईतील फूटपाथ नेमके कुणासाठी? फेरीवाल्यांचा हक्क आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत संतुलन कधी साधणार?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोजगार, व्यवसाय आणि उपजीविकेसाठी दररोज लाखो नागरिक येतात. शहराच्या औपचारिक अर्थव्यवस्थेबरोबरच अनौपचारिक अर्थव्यवस्थेचेही मोठे योगदान आहे. फेरीवाले या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र सार्वजनिक फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यास प्रश्न केवळ फेरीवाल्यांच्या उपजीविकेपुरता मर्यादित राहत नाही; तो थेट पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, वाहतूक व्यवस्थेचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा बनतो. मुंबईतील अनेक […]

अधिक वाचा..

महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिवेशनात विधेयक शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून जाहीर केले असल्याचे सांगत, महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध पावले […]

अधिक वाचा..

विठ्ठल मंदिरातील भाविकांच्या सुविधा आणि नागरिकांच्या हक्कांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे

पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेत मंदिर परिसरातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी मंदिरातील अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. मंदिर परिसरात काही ठिकाणी अद्याप पाणी गळती होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पुरातत्त्व विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे […]

अधिक वाचा..

शहरी कामगारांच्या हक्कांसाठी युवक काँग्रेसचा एल्गार; शहरी कामगार न्याय अभियान सुरू

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचे त्या म्हणाल्या. मुंबई काँग्रेस कार्यालयात […]

अधिक वाचा..

बार्शीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा! विकासकामे व शेतकऱ्यांचा पहिला हक्क

सोलापूर: राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम अधिकार शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत त्यांनी सांगितले की, सरकारने सुरू केलेल्या योजनांचा प्रवाह अखंड राहील, कोणतीही योजना बंद होणार नाही. सभेत त्यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या कामाची […]

अधिक वाचा..

अपंगत्व नसताना दिव्यांग लाभ; गुन्हा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमांतर्गत राज्यातील पहिली कारवाई

सांगली: लाक्षणिक अपंगत्व नसतानाही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेतील लाभ घेतल्याप्रकरणी ईश्वरपूर (जि. सांगली) येथील निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. रघुनाथ राजराम भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा ठरला आहे. शासकीय, निमशासकीय सेवा तसेच विविध योजना व सुविधांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र व […]

अधिक वाचा..

ग्रामसभा आणि तुमचे अधिकार! गावाच्या विकासाची खरी किल्ली

औरंगाबाद: गावाचा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते, इमारती किंवा योजना नव्हते तर गावातील प्रत्येक नागरिकाचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग म्हणजेच खरा विकास होय याच लोकशाही सहभागाचे सर्वात प्रभावी व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा. इथेच नागरिक थेट ग्रामपंचायतीला प्रश्न विचारू शकतात, सूचना देऊ शकतात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. ग्रामसभेत नागरिकांना मिळणारे ७ महत्त्वाचे अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार […]

अधिक वाचा..

परवडणाऱ्या घरांसाठी घर हक्क परिषदेची आता रस्त्यावरची लढाई

हक्कांच्या घरांसाठी ३१ संघटनांचा एल्गार, गिरण्या व कारखान्यांच्या संपूर्ण जागेवर घरे द्या, मुंबईबाहेर घरे घेणार नाही. मुंबई: घर हक्क परिषदेच्या माध्यमातून विविध ३१ संघटना एकत्र आल्या असून परवडणारी घरे मिळाली पाहिजेत यासाठी या संघटना लढा देत आहेत. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजे, मुंबई बाहेर शेलू वांगणी सारख्या दूर जागी जाणार नाही असा स्पष्ट […]

अधिक वाचा..

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल

पुण्यात काँग्रेसचा ‘रोजगार सत्याग्रह’ यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. २०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभागातील (WCD) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी अशा एकूण ४,६०० पेक्षा अधिक अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू […]

अधिक वाचा..