बार्शीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा! विकासकामे व शेतकऱ्यांचा पहिला हक्क

सोलापूर: राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम अधिकार शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत त्यांनी सांगितले की, सरकारने सुरू केलेल्या योजनांचा प्रवाह अखंड राहील, कोणतीही योजना बंद होणार नाही. सभेत त्यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या कामाची […]

अधिक वाचा..

अपंगत्व नसताना दिव्यांग लाभ; गुन्हा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमांतर्गत राज्यातील पहिली कारवाई

सांगली: लाक्षणिक अपंगत्व नसतानाही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेतील लाभ घेतल्याप्रकरणी ईश्वरपूर (जि. सांगली) येथील निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. रघुनाथ राजराम भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा ठरला आहे. शासकीय, निमशासकीय सेवा तसेच विविध योजना व सुविधांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र व […]

अधिक वाचा..

ग्रामसभा आणि तुमचे अधिकार! गावाच्या विकासाची खरी किल्ली

औरंगाबाद: गावाचा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते, इमारती किंवा योजना नव्हते तर गावातील प्रत्येक नागरिकाचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग म्हणजेच खरा विकास होय याच लोकशाही सहभागाचे सर्वात प्रभावी व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा. इथेच नागरिक थेट ग्रामपंचायतीला प्रश्न विचारू शकतात, सूचना देऊ शकतात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. ग्रामसभेत नागरिकांना मिळणारे ७ महत्त्वाचे अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार […]

अधिक वाचा..

परवडणाऱ्या घरांसाठी घर हक्क परिषदेची आता रस्त्यावरची लढाई

हक्कांच्या घरांसाठी ३१ संघटनांचा एल्गार, गिरण्या व कारखान्यांच्या संपूर्ण जागेवर घरे द्या, मुंबईबाहेर घरे घेणार नाही. मुंबई: घर हक्क परिषदेच्या माध्यमातून विविध ३१ संघटना एकत्र आल्या असून परवडणारी घरे मिळाली पाहिजेत यासाठी या संघटना लढा देत आहेत. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजे, मुंबई बाहेर शेलू वांगणी सारख्या दूर जागी जाणार नाही असा स्पष्ट […]

अधिक वाचा..

रोजगाराचा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे, युवकांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढेल

पुण्यात काँग्रेसचा ‘रोजगार सत्याग्रह’ यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला. २०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभागातील (WCD) स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी अशा एकूण ४,६०० पेक्षा अधिक अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू […]

अधिक वाचा..

गिग कामगारांचे हक्क, पुणे येथील MPSC च्या अपघातग्रस्त उमेदवारांची संधी आणि पुणे नाट्यगृहांची दुरवस्था

पुणे: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासास महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर निवेदनं सादर केली. या निवेदनांमध्ये अ‍ॅप आधारित गिग व प्लॅटफॉर्म सेवा क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांचे रक्षण, अपघातग्रस्त व अपंग उमेदवारांसाठी परीक्षेची विशेष संधी, आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहांच्या […]

अधिक वाचा..

राज्यास्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे

मुंबई: राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील. बाजार समित्यांसदर्भातील निर्णय घेत […]

अधिक वाचा..

लहान मुले व महिलांच्या मूलभूत हक्कांच्या होत असलेल्या उल्लंघनाबाबत कायदेशीर कारवाई करा…

मुंबई: भिवंडी, जिल्हा ठाणे येथे साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून साठ हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार १७ नोव्हेंबर २४ रोजी घडला आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. लहान मुले, महिला, शोषित व वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या मूलभूत हक्कांचे होत असलेले […]

अधिक वाचा..

मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला शिंदे – फडणवीस सरकारने कात्री लावण्याचे केले पाप…

मुंबई: विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या […]

अधिक वाचा..

ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही

मुंबई: विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याने ही समिती पुनर्गठीत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार केली. विधानसभेचे कामकाज खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून बुधवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. आज सभागृह सुरू होताच […]

अधिक वाचा..