आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश! राष्ट्रवादीशी चर्चा करूनच निर्णय; उदय सामंत

मुंबई: माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करूनच करण्यात आला असून, यामुळे महायुतीत कोणताही वाद निर्माण झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की, महायुतीतील सर्व मित्र […]

अधिक वाचा..

१.१४ लाख कोटींच्या ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ करारामागे डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा; उदय सामंत

एमएमआरमध्ये उभारला जाणार ५०० मेगावॅट क्षमतेचा ग्रीन एआय डेटा सेंटर पार्क; ३ हजारांपर्यंत रोजगारनिर्मितीची शक्यता मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत करण्यात आलेला १.१४ लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार हा शिवसेना खासदार Dr. Shrikant Shinde यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश असल्याचे उद्योगमंत्री Uday […]

अधिक वाचा..

भरसभेत शिंदेंनी उदय सामंतांना लावला फोन स्पीकर वर ठेवला अन…

1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या […]

अधिक वाचा..

सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल; शिवसेना नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांचा विश्वास

सांगलीसह रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा काल मुक्तागिरी येथे शिवसेनेत प्रवेश मुंबई: सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल, असा विश्वास शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सांगलीतील पाच माजी नगरसेवकांनी तसेच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्री सामंत […]

अधिक वाचा..

राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले; उदय सामंत

हिंदी भाषेविषयी आदित्य ठाकरेंनी आता भूमिका बदलली मुंबई: राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते. डॉ. माशेलकर समितीने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत, असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता, मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील […]

अधिक वाचा..

अभिजात मराठी साठी लवकरच समिती गठित; मराठी भाषा मंत्री उदय सामंत

मुंबई: मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून आता भाषेच्या संशोधन आणि विकासासाठी आणि भाषेच्या उन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आजच्या बैठकीत सांगितले. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक विभागास १०० दिवसांमध्ये करावयाची उद्दिष्टे दिली आहेत, त्या अनुषंगाने […]

अधिक वाचा..

उदय सामंत हे जेएनयू विद्यापीठाला भेट देणारे पहिले मंत्री

मंत्री उदय सामंत यांची जेएनयू मधील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट दिल्ली: महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत यांनी आज दिल्ली येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) ला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी मंत्री उदय सामंत हे महाराष्ट्रातून JNU विद्यापीठाला भेट देणारे […]

अधिक वाचा..

मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला; मंत्री उदय सामंत

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी […]

अधिक वाचा..

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे

मुंबई: मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहिर करण्यात आला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन […]

अधिक वाचा..

मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार; मंत्री उदय सामंत

मा. राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान पुणे: मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित विश्व मराठी संमेलन २०२५ चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, साहित्यिक […]

अधिक वाचा..