मुंबई: महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नागपूरच्या दिक्षाभूमी ते सेवाग्राम दरम्यान संविधान सत्याग्रह यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची तयारी करण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे.
या समितीत माजी मंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत कांबळे, नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, उपाध्यक्ष सुरेश भोयर, प्रदेश सरचिटणीस कुंदा राऊत, शेखर शेंडे, अनंत मोहोड, प्रदेश सचिव रमण चौधरी हे सदस्य तर समन्वयक म्हणून सरचिटणीस संदेश सिंगलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.