मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा विक्रम मोडल्याचा दावा केला जात असला, तरी गेल्या १२ वर्षांत देशासाठी त्यांच्या सरकारने नेमके काय योगदान दिले, हा संशोधनाचा विषय असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. “मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही आणि दाखवण्यासारखे ‘काम’ही […]

अधिक वाचा..

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षाच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ‘भारतातील आर्थिक-राजकीय संकटे : वास्तव आणि परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुणकुमार, पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर तसेच प्रदेश […]

अधिक वाचा..

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या ७ हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण; २६ ते २९ मेदरम्यान टिळक भवन येथे शिबिर

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या अभियानातून तब्बल ७ हजार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६ ते २९ मेदरम्यान मुंबईतील टिळक भवन येथे विभागनिहाय पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal […]

अधिक वाचा..

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असे वक्तव्य काँग्रेसकडून करण्यात आल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. सोमवारी ठाणे येथे झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, अशा प्रकारची विधाने निंदनीय असून देशाच्या प्रतिमेला धक्का […]

अधिक वाचा..

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी आरोप केला की, धिरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असून, त्या वेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर, मतदारसंघनिहाय ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. यासंदर्भात ॲड. कोंडविलकर यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेत पत्र सादर केले. त्यांनी […]

अधिक वाचा..

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम हल्ल्याला एक वर्ष उलटूनही हल्लेखोरांना शिक्षा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिंदे म्हणाले, “देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे.” पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी काँग्रेसवर सडकून टीका […]

अधिक वाचा..