भरधाव कारचा थरार! पाच दुचाकींना उडवले, वकील मुलीसह वडिलांचा मृत्यू

कोल्हापूर: शहरातील शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ मार्गावर शनिवारी दुपारी भरधाव चारचाकीने घातलेला थरार दोन निष्पाप जीवांच्या बळीवर थांबला. बेदरकार कारचालकाने सलग पाच दुचाकींना धडक दिल्याने वकील मुलीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातानंतर संतप्त जमावाने कारचालकाची धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या दुर्घटनेत दीपक सहदेव वंशे (62, […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? महायुतीच्या संख्याबळामुळे मविआपुढे मोठे आव्हान

मुंबई:  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मे २०२० मध्ये विधानसभेच्या सदस्यांमधून हे नऊ आमदार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र सध्याची राजकीय […]

अधिक वाचा..

ईव्हीएम सापडल्याने खळबळ! बार-हॉटेलच्या आवारात मशिन कशी? प्रशासनाकडे स्पष्टीकरण

मोहोळ: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी संपूर्ण राज्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे निवडणूक प्रशासनाची झोप उडाली आहे. मोहोळ शहराजवळील एका खाजगी बार व हॉटेलच्या परिसरात चक्क ईव्हीएम मशिन आढळून आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मशिन जमा करण्याची घाई […]

अधिक वाचा..

प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य दुर्दैवी व राजकीय संस्कारशून्य; राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र निषेध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब तसेच पवार कुटुंबीयांबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार आणि राजकीय संस्कारशून्य आहे. अशा विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. पार्थ पवार हे शरद पवार साहेबांना केवळ कुटुंबीय म्हणून भेटतात, असे विधान करून दरेकर यांनी केवळ एका कुटुंबावर […]

अधिक वाचा..

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वन पुणे: शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर ईनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर ईनामदार ( वय ७) या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी जुन्नरमध्ये पचारासाठी आले असता त्यांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर […]

अधिक वाचा..

रामदास कदम आपण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अभद्र टिप्पणी करू नये; आनंद परांजपे

ठाणे: उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजितदादा पवार यांनी घ्यावी हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय होता परंतु शिवसेनेचे नेते रामदास कदम आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जी अभद्र टिप्पणी करत आहेत. आम्ही देखील रामदास कदम तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात आपल्यावर केलेले आरोप आणि तुमच्या कुटुंबांचे असलेले डान्सबार याबाबत […]

अधिक वाचा..

कामगार कायदे लागू, मात्र माध्यमकर्मी अजूनही वंचित; पत्रकार नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: केंद्र सरकारने देशात चार नवीन कामगार कायदे लागू करून कामगार सुधारणा दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले असले, तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांतील पत्रकार व माध्यमकर्मी या कल्याणकारी तरतुदींंपासून अजूनही वंचित असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील हजारो माध्यमकर्मी आजही सामाजिक सुरक्षा, नोंदणी, किमान वेतन आणि कल्याणकारी योजनांपासून दूर आहेत. […]

अधिक वाचा..

लग्नाआधी लोकशाहीच कर्तव्य! शेरवानीत नवरदेव थेट मतदान केंद्रावर

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या रांजणगाव -कान्हूर मेसाई या गटात ‘काटे की टक्कर’ चाललेल्या मतदानात एका-एका मतांचा विचार होत आहे. अशाप्रसंगी आज स्वतःचं लग्न असतानाही ‘आधी मतदान, मग लग्न’ असं ठरवून नवरदेव गणेश खर्डे यांनी चक्क आपला मतदानाचा हक्क बजावला. याची चर्चा कान्हूर मेसाईमध्ये दिवसभर रंगली. कान्हूर मेसाई येथील जि.प शाळेत या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात विक्रमी ७५.५९ टक्के मतदान…

२ लाख २८ हजारांहून अधिक मतदारांचा लोकशाहीवर ठाम विश्वास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत विविध मतदान केंद्रांवर दि. ०७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत […]

अधिक वाचा..

सकाळी उपाशीपोटी चहा-कॉफी पिणे ठरू शकते घातक

भारतीयांमध्ये चहा-कॉफीशिवाय सकाळची सुरुवात होत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. झोपेतून उठल्याबरोबर अनेक जण बेड टी घेण्याची सवय लावून घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा पोटाचे तज्ज्ञ डॉ. शुभम वत्स यांनी दिला आहे. उपाशीपोटी चहा पिण्याचा ट्रेंड डॉक्टरांच्या मते भारतात ‘बेड टी’ घेणे हा जणू एक ट्रेंड बनला आहे. […]

अधिक वाचा..