गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतुल्य नेतृत्वाला विनम्र अभिवादन

मुंबई: भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजनाचा उत्सव नसून प्रेरणा देणाऱ्या, घडवणाऱ्या आणि संकटसमयी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. समाजजीवनाप्रमाणेच राजकारणातही काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांच्या नेतृत्वातून हजारो कार्यकर्ते घडतात, त्यांना दिशा मिळते आणि संघर्ष करण्याची ऊर्जा प्राप्त होते. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे […]

अधिक वाचा..

एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्डची मुदत वाढली; आता १ सप्टेंबरपर्यंत मिळणार अतिरिक्त वेळ

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. पूर्वी १ ऑगस्टपर्यंत असलेली अंतिम मुदत आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आणखी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. […]

अधिक वाचा..

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीच्या परंपरेनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी […]

अधिक वाचा..

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ गुरुवार (३० जुलै) रोजी सकाळी ११ वाजता वरळी येथील एनएससीआय डोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानात युवक, विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशामुक्त […]

अधिक वाचा..

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या दर्जाच्या भाषेवर टीका होत आहे. सार्वजनिक चर्चेत सभ्य भाषेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे; पण शिवीगाळ, वैयक्तिक अपमान आणि अश्लीलतेचे समर्थन कोणत्याही बाजूने होऊ शकत नाही. पण या वादात एक वेगळाच विरोधाभास समोर येतो आहे. ज्यांनी […]

अधिक वाचा..

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके यांनी घेतली भेट शिरूर दि.२९ ( अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी येथील ७५ वर्षीय केरबा बाबूराव खोरे यांच्या पंढरपूर वारीदरम्यान एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या मुलाखतीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आयुष्यभर दुःखाचे डोंगर पेलत एकाकी जीवन जगणाऱ्या या वृद्ध शेतकऱ्याची […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र पशु संरक्षण’ कायद्याचा हेतू जरी चांगला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असल्याचे धक्कादायक चित्र शिरुर तालुक्यातील तांदळी परिसरात समोर आले आहे. उपयोगात नसलेल्या वासरांचा सांभाळ करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाल्याने काही जणांकडून रात्रीच्या अंधारात वासरे रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर अथवा […]

अधिक वाचा..

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला. कालव्याच्या सुरुवातीच्या म्हणजेच ‘हेड’कडील भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असतानाही प्रशासनाने शेवटच्या टोकाकडून म्हणजेच ‘टेल’कडून अस्तरीकरणाचे काम सुरू केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार (दि २७) सकाळी सुमारे अकरा वाजता सुरु असलेले काम बंद पाडले. […]

अधिक वाचा..

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि प्रामाणिक नात्यांचा आधार घ्यायला हवा. आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, […]

अधिक वाचा..

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम करणारे कर्मचारी यांसारख्या असंख्य जणांचे काम हे बैठ्या स्वरूपाचे असते. शेतात किंवा कष्टाचे काम करण्यापेक्षा बैठे काम बरे वाटत असले तरी त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या […]

अधिक वाचा..