शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत चर्मकार वस्ती रोडच्या कामासाठी बनावट बिल तयार करत शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रतीभा बोरकर आणि शहनाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विष्णु लक्ष्मण गाडीलकर (वय ५४, रा. टाकळी हाजी, सध्या रा. सॉलीटीअर बिल्डींग, फ्लॅट क्र. २०४, बिजे कॉर्नर, शिरुर) यांनी शिरुर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये भररस्त्यात महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावून चोरट्यांचा पोबारा

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरात दिवसेंदिवस सोनं साखळी चोरीचे प्रमाण वाढतं असुन रस्त्यावररुन जाणाऱ्या महिलेला लक्ष्य करत दोन अनोळखी व्यक्तींनी जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. ५ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:४० च्या दरम्यान शिरुर येथील पाबळ फाटा ते रामलिंग रोडवरील वॉशिंग सेंटरच्या समोर घडली. याबाबत त्रिवेणी शशिकांत गोळे (वय […]

अधिक वाचा..

स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही

साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. […]

अधिक वाचा..

शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी घरगुती उपाय 

रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या करतात. या मुळातच एखाद्या प्लेट प्रमाणे दिसतात, त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली जाते. रक्तात प्रामुख्याने तीन पेशी असतात, लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तात […]

अधिक वाचा..

सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर

सायंकाळी ५.३० पर्यंत जेवल्यानंतर थेट सकाळी १० वाजता नंतर जेवण करावे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि पोटावरील फॅट्स कमी होतात. या अभ्यासात सहभाग घेतलेल्या लोकांनी मेडिटेरेनियन आहार घेतला. हा आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सर्व उपवास करणाऱ्या गटांमध्ये वेळ ठरवून उपवास न केल्याने वजन कमी होते म्हणजेच सरासरी ३-४ किलो वजन कमी […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात सुपूर्द

४५ महिला व ३५ पुरुषांचीही यशस्वी शोधमोहीम शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत संवेदनशील व कौतुकास्पद अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा यशस्वी शोध घेण्यात आला असून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस मेष राशीसाठी आर्थिक आणि करिअरसंबंधी संधींनी भरलेला असेल. छोटे-मोठे पार्ट-टाइम व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करु शकता. ज्यामुळे भविष्यात उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग खुले होतील. बऱ्याच काळापासून सुरू असलेली मेहनत आता फळाला येते आहे तसेच हळूहळू आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना जास्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिक यात्रा लाभदायक ठरतील, विशेषतः […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट केला नाही पण […]

अधिक वाचा..

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

मुंबई: राज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूमी अभिलेख विभागातील मोजणीदारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजणीदार संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत असल्याचे जाहीर केले. सातव्या […]

अधिक वाचा..

समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल

मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग […]

अधिक वाचा..