महिलांनो रुटीन चेकअप टाळताय, जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात…

स्वास्थ्य चांगलं म्हणजे सगळंच चांगलं. शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण एखाद्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो. पण तसे करणे चांगले नाही. महिलांना त्याच्या तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते. प्रत्येकानीच रूटीन चेकअप करायला हवं. आजारपण सांगून येत नाही. त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. काही त्रास आहेत जे महिलांना होण्याची शक्यता जास्त आहे. हे आजार कोणते […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रु, राज्य शासनाचा जीआर आला, वाचा सविस्तर

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत सहाव्या हप्त्यासह काही थकीत हप्त्यांचे वितरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 2000 रुपये थेट बँक खात्यात मिळणार असून, त्यासाठी 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शासनाचा महत्त्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो, […]

अधिक वाचा..

निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल होणार

मुंबई: काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल करण्यात येणार आहेत. फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ते […]

अधिक वाचा..

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खाके के बिल्ली हज को चली’

दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पेट्रोल ४० रुपये लिटर करण्याच्या ‘सौगात’चे काय झाले मुंबई: नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तीमत्व म्हणून २००२ साली गुजरात मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकावर अत्याचार झाले, त्यांचे मॉब लिंचिंग झाले, ही सर्व जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे असे तत्कालीन परिस्थितीत म्हटले गेले. […]

अधिक वाचा..

प्रशांत कोरटकरसोबत फडणविसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का, मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी […]

अधिक वाचा..

संपूर्ण मे महिन्यात संयुक्त महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन ‘महाराष्ट्र महोत्सव’ म्हणून साजरा करणार

मुंबई: शिवनेरीवर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचे मानबिंदू असून रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी महाराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर शाहू – फुले – आंबेडकरांची सामाजिक समतेची वेगळी ओळख…साधूसंतांचा महाराष्ट्र… अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात असून मुंबईत तीन दिवस कार्यक्रम झाल्यानंतर विदर्भाच्या भूमीमध्ये… (वर्धा येथील बापूजींच्या आश्रमात), […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील काळूबाईनगर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

शिरूर (अरुणकुमार मोटे): काळूबाईनगर ही शिरूर तालुक्यातील कवठे केंद्रातील ३४ पट असलेली छोटी शाळा आणि छोट्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अडथळा येतो. हा गैरसमज दूर करण्याची कामगिरी या शाळेने करून दाखवली. पालकांना आणि प्रेक्षकांना तब्बल साडेतीन तास एका जागेवर खिळवून ठेवण्याची किमया या शाळेतील विद्यार्थ्यांनी करून दाखवली. शिवराज्याभिषेक सोहळा,प्रतीकात्मक विवाह सोहळा, बळीराजाची व्यथा, महाराष्ट्राची लोकधारा […]

अधिक वाचा..

शिरूरकरांना पाणीटंचाई जाणवू देणार नाही; आमदार माऊली कटके

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातील पाणी टंचाईवर अखेर तोडगा निघाला असून आता नियमित पाणीपुरवठा सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आमदार माऊली आबा कटके यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि तातडीच्या हालचालींमुळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. २० मार्चपासून सुरू झालेल्या दिवसाआड पाणी […]

अधिक वाचा..

निलेश वाळुंज यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची अण्णापूर शाळेला तातडीने भेट

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षणाच्या दयनीय परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी उचललेल्या आवाजानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून अन्नापुर ता. शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षकाच्या जागा रिक्त होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. संबंधित शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे निलंबनाची कारवाई उशिराने झाली, मात्र नवीन शिक्षक नेमण्यास शिक्षण […]

अधिक वाचा..

साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खाव

वजन कमी करण्यासाठी जेव्हा लोक हेल्दी डाएटचा आधार घेतात तेव्हा सगळ्यात आधी आहारातून साखर हटवतात. जितकं होईल तितकं कमी कमी साखरेचं सेवन करतात. साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्ही फक्त फिट राहत नाहीत तर अनेक हेल्थ बेनिफिट्सही मिळतात. जे लोक गोड खाण्याचे शौकिन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणं खूपच कठीण असतं. खासकरून जेव्हा गोड […]

अधिक वाचा..